शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जिद्द, सातत्य, संयमातून कल्पना सत्यात उतरतात : रश्मी बन्सल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:30 IST

स्वत:च्या कल्पनांवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच आहे, असे मत लेखिका, मोटिव्हेशनल गुरू रश्मी बन्सल यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : जिद्द, सातत्य आणि संयमातनू कल्पना सत्यात उतरतात. लोक तुम्हाला जेव्हा मूर्ख म्हणतील तीच यशाची खूण समजावी. स्वत:च्या कल्पनांवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच आहे, असे मत लेखिका, मोटिव्हेशनल गुरू रश्मी बन्सल यांनी गुरुवारी व्यक्त केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये ‘औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन’ (एएमए) आयोजित रेअर-शेअर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जि.प. सीईओ पवनीत कौर, एएमएचे चेअरमन सी. पी. त्रिपाठी, सतीश कागलीवाल, प्राचार्य उल्हास शिऊरकर, डॉ.सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती. 

बन्सल म्हणाल्या, प्रत्येकाच्या मनात वेळोवेळी चांगल्या कल्पना येत असतात, त्या कल्पनांवर जो विश्वास ठेवतो तोच पुढे जाण्यात यशस्वी होतो. जेव्हा आपण जगावेगळे काम करतो तेव्हा लोक मूर्खात काढतात. तेव्हा खचून न जाणे हीच यशाची पावती असते. बन्सल यांनी स्वत:च्या आयुष्याचा प्रवास या कार्यक्रमात उलगडला. त्या म्हणाल्या, माझे वडील शास्त्रज्ञ असताना मला मात्र विज्ञान आवडत नव्हते. म्हणून मी १२ वीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. नंतर एमबीए केले, पण नोकरी करायची हे ठरविले, दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रात लिखाण केले. त्या व्यासंगातून पत्रकारितेची आवड निर्माण झाली. मुक्तपत्रकार म्हणूनही काम केले. त्यातच एक मासिक काढले, मात्र त्यात तोटा आल्याने ते बंद केले.

आजवरच्या जीवनप्रवासात अनेक चढउतार अनुभवल्यानंतर ‘स्टे फुलीश स्टे हंग्री’ हे पहिले पुस्तक लिहिले. ते पुस्तक बेस्ट सेलर झाल्याने मी लेखिका झाले. तेथून पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. डॉटेड लाईन्स, फॉलो एव्हरी रेनबो, टेक मी होम, पुअर लिटिल रिच स्लम ही पुस्तके पुढे लिहिली. पत्रकार, संपादक आणि लेखक असा प्रवास त्यांनी उलगडला. 

धारावीतील उद्योजकता पाहाबन्सल यांनी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील उद्योजकतेची माहिती सांगितली. त्या म्हणाल्या धारावी किती लोकांनी पाहिली आहे. हॉलमधील अनेकांनी हात उंचावले. धारावीत काय पाहिले याचे उत्तर त्यांनी हॉलमधील हात उंचावणाऱ्यांना विचारले. अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. सर्वांची उत्तरे ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या, धारावीतील ९० टक्के  लोक स्वत:च्या छोटेखानी उद्योगाचे मालक आहेत. दहा बाय दहा इतक्या कमी जागेत त्या झोपडपट्टीत प्रत्येकाचा स्वत:चा काही ना काही व्यवसाय आहे. आपल्याला घर, गाडी, चांगला फ्लॅट असूनही आपण उदासीन असतो; पण धारावीत जाऊन पाहा लोक आनंदीच दिसतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबादliteratureसाहित्य