शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिद्द, सातत्य, संयमातून कल्पना सत्यात उतरतात : रश्मी बन्सल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:30 IST

स्वत:च्या कल्पनांवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच आहे, असे मत लेखिका, मोटिव्हेशनल गुरू रश्मी बन्सल यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : जिद्द, सातत्य आणि संयमातनू कल्पना सत्यात उतरतात. लोक तुम्हाला जेव्हा मूर्ख म्हणतील तीच यशाची खूण समजावी. स्वत:च्या कल्पनांवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच आहे, असे मत लेखिका, मोटिव्हेशनल गुरू रश्मी बन्सल यांनी गुरुवारी व्यक्त केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये ‘औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन’ (एएमए) आयोजित रेअर-शेअर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जि.प. सीईओ पवनीत कौर, एएमएचे चेअरमन सी. पी. त्रिपाठी, सतीश कागलीवाल, प्राचार्य उल्हास शिऊरकर, डॉ.सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती. 

बन्सल म्हणाल्या, प्रत्येकाच्या मनात वेळोवेळी चांगल्या कल्पना येत असतात, त्या कल्पनांवर जो विश्वास ठेवतो तोच पुढे जाण्यात यशस्वी होतो. जेव्हा आपण जगावेगळे काम करतो तेव्हा लोक मूर्खात काढतात. तेव्हा खचून न जाणे हीच यशाची पावती असते. बन्सल यांनी स्वत:च्या आयुष्याचा प्रवास या कार्यक्रमात उलगडला. त्या म्हणाल्या, माझे वडील शास्त्रज्ञ असताना मला मात्र विज्ञान आवडत नव्हते. म्हणून मी १२ वीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. नंतर एमबीए केले, पण नोकरी करायची हे ठरविले, दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रात लिखाण केले. त्या व्यासंगातून पत्रकारितेची आवड निर्माण झाली. मुक्तपत्रकार म्हणूनही काम केले. त्यातच एक मासिक काढले, मात्र त्यात तोटा आल्याने ते बंद केले.

आजवरच्या जीवनप्रवासात अनेक चढउतार अनुभवल्यानंतर ‘स्टे फुलीश स्टे हंग्री’ हे पहिले पुस्तक लिहिले. ते पुस्तक बेस्ट सेलर झाल्याने मी लेखिका झाले. तेथून पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. डॉटेड लाईन्स, फॉलो एव्हरी रेनबो, टेक मी होम, पुअर लिटिल रिच स्लम ही पुस्तके पुढे लिहिली. पत्रकार, संपादक आणि लेखक असा प्रवास त्यांनी उलगडला. 

धारावीतील उद्योजकता पाहाबन्सल यांनी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील उद्योजकतेची माहिती सांगितली. त्या म्हणाल्या धारावी किती लोकांनी पाहिली आहे. हॉलमधील अनेकांनी हात उंचावले. धारावीत काय पाहिले याचे उत्तर त्यांनी हॉलमधील हात उंचावणाऱ्यांना विचारले. अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. सर्वांची उत्तरे ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या, धारावीतील ९० टक्के  लोक स्वत:च्या छोटेखानी उद्योगाचे मालक आहेत. दहा बाय दहा इतक्या कमी जागेत त्या झोपडपट्टीत प्रत्येकाचा स्वत:चा काही ना काही व्यवसाय आहे. आपल्याला घर, गाडी, चांगला फ्लॅट असूनही आपण उदासीन असतो; पण धारावीत जाऊन पाहा लोक आनंदीच दिसतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबादliteratureसाहित्य