शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पर्यटनस्थळांबाबतचा निर्णय दहा दिवसांत, केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 07:59 IST

आदित्य ठाकरे : मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या पुढील काही दिवसांत कमी झाली तर पर्यटनस्थळे खुली करण्याचा सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे कमी होतील, अशी अपेक्षा आहे, असे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे सांगितले.

विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून, लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. औरंगाबाद म्हणून नाही, तर मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळानंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधून-मधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. 

शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ‘ॲक्शन बेस प्लॅन’ तयार करावा लागेल. पर्यावरणाशी सुसंगत वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत ऊर्जेच्या नवीन स्रोतांवर लक्ष देण्याचे धोरण आहे, असे ठाकरे म्हणाले. 

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा२०२० अर्थसंकल्पात पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोनाकाळात आरोग्य विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, त्यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAditya Thackreyआदित्य ठाकरेtourismपर्यटन