शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सरसकट साडेसोळाशे कोटींची कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 13, 2017 01:00 IST

जालना : राज्यातील शेतकऱ्यांना तत्त्वत: सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्यसरकारने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील शेतकऱ्यांना तत्त्वत: सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्यसरकारने केली आहे. कर्जमाफीच्या या निर्णयाची २५ जुलैपर्यंत अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात असे झाल्यास जालना जिल्ह्यातील जुने व चालू थकबाकीदार असलेल्या दोन लाख ९६ हजार १४८ शेतकऱ्यांना १६३६ कोटी १८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.कृषी विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ३५ हजार असून, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख सात हजार एवढी आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार १५२ शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामात एकूण १३७७ कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. बँकांकडील नोंदीनुसार यामध्ये एक हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ६७ हजार एवढी आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनापासून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला तर राज्यातील एकूण थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची रक्कम याबाबत माहिती एकत्रित करण्याचे आदेश सरकारने संबंधित विभागांना दिले होते. त्यानंतर जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ३१ मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँकांच्या जुन्या व चालू थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ८३ हजार ८२३ असून, थकबाकीचा आकडा १४४ कोटी ४४ लाखांपर्यत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे ग्राहक असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या एक लाख ६१ हजार २२४ असून, कृषी कर्ज थकबाकीची रक्कम १०२०.८४ कोटी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ५१ हजार १०१ आहे, तर थकबाकीचा आकडा ४७०.९० कोटी एवढी आहे. अल्प व बहुभूधारक शेतकऱ्यासांठी शासनाने निकषानुसार सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शासनस्तरावरून बॅकांना अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झालेली नाहीत. २०१६ मध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या व चालू थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का, याबाबत अद्याप शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी कोणत्या निकषानुसार करायची याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही आघाव यांनी लोकमशी बोलताना सांगितले.