शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट साडेसोळाशे कोटींची कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 13, 2017 01:00 IST

जालना : राज्यातील शेतकऱ्यांना तत्त्वत: सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्यसरकारने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील शेतकऱ्यांना तत्त्वत: सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्यसरकारने केली आहे. कर्जमाफीच्या या निर्णयाची २५ जुलैपर्यंत अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात असे झाल्यास जालना जिल्ह्यातील जुने व चालू थकबाकीदार असलेल्या दोन लाख ९६ हजार १४८ शेतकऱ्यांना १६३६ कोटी १८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.कृषी विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या पाच लाख ३५ हजार असून, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख सात हजार एवढी आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार १५२ शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामात एकूण १३७७ कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. बँकांकडील नोंदीनुसार यामध्ये एक हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ६७ हजार एवढी आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनापासून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला तर राज्यातील एकूण थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची रक्कम याबाबत माहिती एकत्रित करण्याचे आदेश सरकारने संबंधित विभागांना दिले होते. त्यानंतर जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ३१ मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँकांच्या जुन्या व चालू थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ८३ हजार ८२३ असून, थकबाकीचा आकडा १४४ कोटी ४४ लाखांपर्यत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे ग्राहक असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या एक लाख ६१ हजार २२४ असून, कृषी कर्ज थकबाकीची रक्कम १०२०.८४ कोटी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या ५१ हजार १०१ आहे, तर थकबाकीचा आकडा ४७०.९० कोटी एवढी आहे. अल्प व बहुभूधारक शेतकऱ्यासांठी शासनाने निकषानुसार सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शासनस्तरावरून बॅकांना अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झालेली नाहीत. २०१६ मध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या व चालू थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का, याबाबत अद्याप शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी कोणत्या निकषानुसार करायची याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही आघाव यांनी लोकमशी बोलताना सांगितले.