शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

औरंगाबादेत दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:37 IST

अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर तातडीने दुचाकीने औरंगाबादकडे येणाºया तरुणाचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पडेगाव येथील हनुमान मंदिरासमोर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वेगवेगळ्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा अंत झाल्याने बोरसर गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देहळहळ : अपघातात मरण पावलेल्या मित्राकडे जाताना दुसºया मित्रावरही काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर तातडीने दुचाकीने औरंगाबादकडे येणाºया तरुणाचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पडेगाव येथील हनुमान मंदिरासमोर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वेगवेगळ्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा अंत झाल्याने बोरसर गावावर शोककळा पसरली.प्रवीण गोटुराम पवार ( २५, रा. बोरसर, गल्लेबोरगाव) आणि प्रदीप आनंद रंधे (२१), अशी दुर्दैवी मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रवीण आणि प्रदीप हे जिवलग मित्र. प्रवीण आणि अमोल घुमे हे मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त गल्लेबोरगाव येथे दुचाकीने गेले होते. बोरगाव येथून ते गावी परत जात असताना त्यांना बोरगाव टाकळी येथे भरधाव येणाºया पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रवीण आणि अमोल जखमी झाले. या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाल्याने त्यास औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना प्रवीणचा मृत्यू झाला. ही बाब प्रदीपला कळल्याने तो रात्री उशिरा दुचाकीने मित्राला पाहण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने येऊ लागला. पडेगावजवळील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रदीप गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. पडेगाव येथील नागरिकांनी त्यास तातडीने घाटी रुग्णालयात हलविले; मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी प्रदीप यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ या घटनेचा तपास करीत आहेत.

 

गावावर शोककळाएकाच दिवशी बोरसर येथील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने गावातील वातावरण शोकाकुल बनले आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची बातमी ज्याक्षणी कळली त्या क्षणी चिंतातुर झालेल्या प्रदीपला एक क्षणही थांबवले नाही. मित्राला भेटण्याच्या घाईने आणि चिंतेमुळेच त्याचा अपघातात झाला. मित्राची भेट मात्र झालीच नाही.