शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आत्याच्या घरी मृत्यू, परस्पर दफनविधी; ६ दिवसांनी कब्रस्तानमधून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला

By सुमित डोळे | Updated: November 24, 2023 15:26 IST

शरीरावर खोल, गंभीर जखमांमुळे गूढ वाढले, कुटुंबालाही हत्येचा दाट संशय

छत्रपती संभाजीनगर : नारेगावच्या १९ वर्षीय सालेह फरहान हिलाबी ऊर्फ शहजाद याचा घनसावंगीच्या आत्याच्या घरी १७ नोव्हेंबर रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती न देताच नातेवाइकांनी त्याचा मृतदेह शहरात आणून जिन्सीतील कब्रस्तानात पहाटेच परस्पर दफन केला. मात्र, कुटुंबाने पुन्हा त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला आणि अखेर सातव्या दिवशी गुरुवारी सालेहचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा वर काढण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, सालेहच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा आढळल्याने ही हत्याच असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आई, वडील, दोन भावांसह सालेह नारेगावात राहतो. खासगी काम करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. १४ नोव्हेंबर रोजी सालेह घनसावंगीच्या देवनगरीत राहणाऱ्या आत्याकडे गेला होता. येथून जालना व घनसावंगीला पोहोचेपर्यंत तो सातत्याने वडिलांच्या संपर्कात होता. १७ नोव्हेंबर रोजी मात्र रात्री ८:३० वाजता अचानक त्याच्या वडिलांना नातेवाइकांनी कॉल करून सालेहने आत्महत्या केल्याचे कळवले. घटनेने घाबरलेल्या वडिलांना त्यांनी पुन्हा कॉल करून मृतदेह शहरातच घेऊन येत असल्याचे सांगून रात्री १२ वाजताच ते मृतदेह घेऊन नारेगावमध्ये दाखल झाले होते.

पहाटे दफनविधी, मात्र कोणालाच माहिती नाहीकाही तास घरी सालेहचा मृतदेह ठेवून नातेवाइकांनी जिन्सीच्या गंजे शहिदा कब्रस्तानात पहाटे ३:३० वाजता परस्पर दफनविधी केला. वडिलांना मात्र मुलाच्या मृत्यूविषयीची रुखरूख सल देत होती. त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. पहिले घनसावंगी पोलिसांकडे मुलाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर जिन्सी पोलिसांकडे अर्ज केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यात तपासाची चक्रे फिरवली.

सहा दिवसांनी पुन्हा मृतदेह बाहेर काढलागुरुवारी सकाळीच १० वाजता महसूलचे वरिष्ठ अधिकारी, घाटीचे डॉक्टर, फॉरेन्सिकचे पथक, जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक अनिल मगरे, उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांच्यासह घनसावंगी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. कायदेशीर पंचनामा करून व्हिडीओग्राफरच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुर्गंध पसरू नये, यासाठी घाटीच्या पथकाने रसायनाचा वापर केला. त्यानंतर २.३० वाजता मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हत्याच, त्या खोल जखमा कशाच्या ?सूत्रांच्या माहितीनुसार, आत्याच्या कुटुंबाने जरी आत्महत्या सांगितले असले, तरी तपासात सालेहच्या कपाळासह अन्य शरीरावर खोल जखमा आढळल्या आहेत. त्या कशाच्या आहेत, हे अद्याप अस्पष्ट असले तरी नातेवाईकांच्या दाव्यानुसार सालेहचा मृत्यू झालेल्या ठिकाणी रक्त देखील आढळले हाेते. त्यामुळे सालेहच्या हत्याच्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. घनसावंगी पोलिसांशी वारंवार संपर्क करूनही मात्र घटनेतले तथ्य कळू शकले नाही.

हे प्रश्न अनुत्तरितच-सालेहची आत्महत्या झाल्याचे वडिलांना कळवण्यात आले. मात्र, स्थानिक पाेलिसांना न कळवताच परस्पर मृतदेह शहरात का आणला ?-नारेगावला कुटुंबाच्या घरी काही वेळच मृतदेह ठेवून पहाटेच दफनविधी का केला ?-सालेहच्या अंगावर जखमा होत्या तरी कुटुंबातील कोणत्याच सदस्याने आक्षेप का घेतला नाही? शहरातही स्थानिक पोलिसांना घटनेविषयी का कळवले नाही ?-सालेहचा मृतदेह नारेगावला आणल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे जाळण्याचा किंवा फेकून देण्याचा सल्ला काहींनी का दिला ?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद