शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कोळी वस्तीतील नागरिकांच्या जीवनातला अंधकार संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:02 IST

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगावपासून काही अंतरावर असलेल्या कोळी वस्तीत गेल्या चाळीस वर्षांपासून वीज पोहोचलीच नव्हती. दीडशे लोकसंख्या असलेल्या ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगावपासून काही अंतरावर असलेल्या कोळी वस्तीत गेल्या चाळीस वर्षांपासून वीज पोहोचलीच नव्हती. दीडशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीतील नागरिकांच्या समस्येला ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्यानंतर सुरू झालेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच येथील नागरिकांच्या आयुष्यातला अंधकार संपला आहे.

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने कोळी वस्तीतील नागरिकांनी आनंद साजरा केला. वीजपुरवठा केला जावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी महावितरणकडे २०१५ साली कोटेशन घेतले. २० जणांनी एकत्र येऊन कोटेशनची रक्कम देखील भरली. कोटेशन भरून देखील सहा वर्षांपासून वीजपुरवठा होत नव्हता. याप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरण विभाग खडबडून जागा झाला. ‘देर आये, दुरूस्त आहे’ या म्हणीप्रमाणे अखेर कोळी वस्तीवर रोहित्र बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. काही दिवसांतच हे काम पूर्ण होऊन अखेर वस्तीवर लखलखाट झाला.

---

कोट

मागील चाळीस वर्षांपासून मी कोळी वस्तीवर राहत आहे. शेतवस्तीवर लाईट यावी, यासाठी २०१५ मध्ये कोटेशन भरले होते. परंतु, दखल घेतली गेली नाही. त्यानंतर बातमी प्रकाशित झाल्यावर आमची समस्या सुटली आहे, याचा आनंद आहे. - हरिदास सपकाळ, ज्येष्ठ नागरिक.

----

कोट

याच जन्मी घरात लाईट येईल की नाही, असा प्रश्न माझ्यासमोर होता. अख्खे आयुष्य अंधारात घातले. मात्र, ६७ व्या वर्षी का होईना माझ्या डोळ्यांनी घरात लाइट लागलेला पाहिला आहे. याचा मला आनंद झाला आहे. - चंद्रभागाबाई सपकाळ, कोळी वस्ती.