शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

'दानवे शेतकऱ्यांची माफी मागा'; प्रहार संघटनेचे जलकुंभावर आंदोलन, आत्मदहनाचा दिला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:19 IST

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून माफी मागावी

ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा

औरंगाबाद : शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी प्रहार संघटनेनेचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरु आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागितली नाहीतर आत्मदहन करण्याचा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जालना येथे धक्कादायक विधान केलं आहे. "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं होते. यानंतर त्यांच्याविरोधात शेतकरी आणि राजकीय स्तरातून टीका सुरु झाली असून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी दुपारी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन केले. शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करून आंदोलकांनी दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे अशी भूमिका दानवे यांनी मांडली होती. तसेच "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचकलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं शेतकरी आंदोलनावरुन विधान करून दानवे यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन