शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'दानवे शेतकऱ्यांची माफी मागा'; प्रहार संघटनेचे जलकुंभावर आंदोलन, आत्मदहनाचा दिला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:19 IST

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून माफी मागावी

ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा

औरंगाबाद : शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी प्रहार संघटनेनेचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरु आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागितली नाहीतर आत्मदहन करण्याचा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जालना येथे धक्कादायक विधान केलं आहे. "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं होते. यानंतर त्यांच्याविरोधात शेतकरी आणि राजकीय स्तरातून टीका सुरु झाली असून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी दुपारी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन केले. शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करून आंदोलकांनी दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे अशी भूमिका दानवे यांनी मांडली होती. तसेच "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचकलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं शेतकरी आंदोलनावरुन विधान करून दानवे यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन