शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सराळा बेटाला पुराचा धोका; महंतांचा बेट सोडण्यास नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:27 IST

आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटसह पथक सज्ज

ठळक मुद्देवांजरगावचे ३६० नागरिक सुरक्षीत जागी वांजरगाव ते सराला गोवर्धनदरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटलावैजापूर- श्रीरामपूरकडे जाणारे सगळेच रस्ते पाण्यातया मार्गावरील २२ गावांचा संपर्क तुटला

- मोबीन खान/बाबासाहेब धुमाळ 

वैजापूर (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वरच्या भागातील धरणांचे दरवाजे उघडल्याने जवळपास २ लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत झेपावल्यामुळे प्रशासनाने वांजरगावसह शिंदे वस्ती, वाक वस्ती तसेच सय्यद वस्ती येथील एकूण ३६० नागरिकांना रात्री १० वाजता प्रशासनाने पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षीत स्थळी हलविले. प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, तसेच तहसीलदारांनी वैजापूर तालुक्यातील सराला बेटाला असलेल्या धोक्यामुळे महंत रामगिरी महाराज यांना सुरक्षितस्थळी येण्याबाबत विनंती केली. मात्र, बेट सोडण्यास नकार दिल्याने प्रशासनाची अडचणी झाली.

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, तसेच विविध धरणांतून जवळपास २ लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात येत असल्याने शनिवारीच गंगापूर, वैजापूर, प्रशासनाने ६९ गावांना इशारा होता. रात्रीतून गोदावरीत होणारी पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदी पात्र सोडून वाहत आहे. यामुळे वैजापूर तालुक्यातील १७ गावांना पाण्याची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी अजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोºहाडे यांनी नदीकाठच्या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुक्यातील वांजरगावसह येणाऱ्या शिंदे वस्ती, वाक वस्ती, तसेच सय्यद वस्तीला  पुराचा वेढा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन दुपारी काही नागरिकांसह महिला, मुले, मुलांना येथील जिल्हा परिषदेत हलविण्यात आले होते. मात्र, रात्री १० च्या सुमारास पाण्याचा धोक्यामुळे वांजरगावसह शिंदे वस्ती, वाक वस्ती तसेच सय्यदवस्तीवरील जवळपास ३६० नागरिकांना सुरक्षीत स्थळी नेण्यात आले.गटविकास अधिकारी पवार, एच.आर. बोयनर, तलाठी जितेंद्र चापानेरकर, सरपंच किशोर कोळेकर, उपसरपंच अशोक गागरे, तसेच एनडीआरएफ दलाचे जवान, आरोग्य, शोधपथक, पोलीस पथकेही ठीकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत, तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथे बोटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

वांजरगाव ते सराला गोवर्धनदरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. गोदावरीला महापूर आला आहे. त्यामुळे वैजापूर- श्रीरामपूरकडे जाणारे सगळेच रस्ते पाण्यात गेल्याने रविवारी या मार्गावरील २२ गावांचा संपर्क तुटला आहे, तसेच १७ गावांतील नदीकाठावरील बऱ्याच नागरिकांना रविवारी सायंकाळपर्यंत सुरक्षितस्थळी पाठविले जाऊ शकते.

तालुक्यातील सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावाला जोडणाऱ्या शिऊर- श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव या गावांतील काही वस्त्यांवरील घरांमध्ये पाणी शिरले होते. सावखेडगंगा शिवारातील दीडशे नागरिक असलेल्या हिराडे वस्तीलाही पाण्याचा वेढा  पडू शकतो. 

काही गावांतील वीजपुरवठा खंडित गोदामाई पात्र सोडून वाहत असल्याने गोदाकाठ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच काही ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने विजेच्या तारा जमिनीवर पडल्या. पाण्याची पातळी वाढत असल्याने महावितरण कंपनीने काही गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यावर या भागातील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

‘त्या’ आठवणीने नागरिक पुन्हा भयभीतआॅगस्ट २०१६ ला गोदावरी नदीपात्रात ९० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्याच रात्री पाण्याचा विसर्ग दीड लाखापर्यंत गेला होता आणि ५ आॅगस्टला अडीच लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने अडीच हजार लोकांना स्थलांतर करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तीन वर्षांनंतर गोदावरीने पुन्हा याच तारखेला रौद्ररूप धारण केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

प्रशासनाच्या अडचणींत वाढप्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप व तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी बेटास पुराचा वेढा पडताच महंत रामगिरी महाराज यांना सुरक्षितस्थळी येण्याबाबत विनंती केली. मात्र, बेटातील गोशाळेतील शेकडो गायी, बेटावर अखंड वीणावादन परंपरा सुरू असून विद्यार्थी अंध, अपंग असल्यामुळे बेट सोडणार नसल्याचा महाराजांनी पवित्रा घेतल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

नागमठान बेटाला पुराचा वेढा पडला असून या ठिकाणी अग्निशमन दल व एन. डी. आर. एफची टुकड़ी दाखल  झाली आहे या बेटावर महाराजांसह  40 ते 50 इतर जन आहे. तर आगरकानडगांव  शिवारातील चौपाळयाला देखील पुराच्या पाण्याने वेढले असून याठिकाणी पंधरा ते वीस महिला, पुरुष ,लहान मुले अडकले आहेत.

टॅग्स :floodपूरAurangabadऔरंगाबादRainपाऊसAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद