शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बाप्पावरही दुष्काळाची वक्रदृष्टी

By admin | Updated: August 25, 2014 01:35 IST

जालना: गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जिल्हा सज्ज होतो आहे. मात्र पाऊस ओढ देत असल्यामुळे पडलेल्या दुष्काळाची बाप्पावरही

जालना: गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जिल्हा सज्ज होतो आहे. मात्र पाऊस ओढ देत असल्यामुळे पडलेल्या दुष्काळाची बाप्पावरही वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. दुष्काळाचे कारण सांगत गणपती मूर्ती तसेच इतर साहित्याच्या किंमतीत काहीअंशी वाढ झाली आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तींची स्थानिक कलाकार तसेच पर जिल्ह्यातूनही मोठी आवक वाढत आहे. शहरातील सिंधी बाजार, महात्मा फुले मार्केट, बसस्थानक परिसर, चमन, शनि मंदिर, शिवाजी पुतळा, चंदनझिरा आदी भागात मूर्तींची विक्री होते. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बाजारतही आनंदाचे वातावरण होते. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. दुष्काळाच्या नावाखाली बाजारात तेजी- मंदी वाढत आहे. जालना शहरात कोकणातील पेणसह नगर, मुंबई, इंदौर आदी भागातून विविध आकारातील, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. बाजारपेठ गणेश मूर्तींनी सजली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात गणेश मूर्तींची मोठी बाजारपेठ आहे. वीस ते पंचवीस दुकाने येथे लागतात. १ फुटा पासून पंचवीस फुटापर्यंतची मूर्ती येथे विक्रीस उपलब्ध आहे.यंदा शिवाजी महाराजांच्या पेहरावातील, लालबागचा राजा, जय मल्हार, मोर, तबल्यावर बसलेला तसेच सिंहासनावर अरुढ असलेल्या मूर्तींची संख्या जास्त आहे. मूर्तीकार कन्हैया संत्रे म्हणाले, दुष्काळामुळे काहीअंशी किंमती वाढल्या आहेत. आकर्षक व रेखीव मूर्तींची किंमत जास्त आहे. स्थानिक कलाकारांनी उंच मूर्ती तयार केल्याने मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)