शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रेशीम शेती करा अन् अनुदानही मिळवा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६१ एकरवर तुती लागवड 

By बापू सोळुंके | Updated: May 16, 2024 19:34 IST

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते.

छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक शेतीमध्ये गुंतून न राहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी, यासाठी शासनातर्फे महारेशीम अभियानांतर्गत एकरी ४ लाख रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेत सहभागी होत जिल्ह्यातील ७५० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली आहे. जिल्ह्यात आज ७६१ एकरवर तुती लागवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा रेशीम कार्यालयाकडून मिळाली. 

भारतात रेशीम उत्पादन अत्यल्प असल्याने सुमारे ८ हजार टन रेशीम चीनमधून आयात केले जाते. जिल्ह्यातील पैठण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी विणकरांकडून दरमहा सुमारे ६०० ते ६५० किलो रेशीम सुताची मागणी असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशीम शेती वाढावी यासाठी रोजगार हमी योजनेत या शेतीचा समावेश केला आहे. महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते. तसेच रेशीम शेती करताना शेतकरी कुटुंबाला रोहयोतून मजुरी दिली जाते. सुमारे तीन वर्षांत शेतकऱ्यांना ४ लाख रुपये शासनाकडून दिले जातात. यामुळे रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी बी.डी. डेंगळे पाटील यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आज जिल्ह्यातील ७५० शेतकऱ्यांनी ७६१ एकरवर रेशीम लागवड केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांच्यासाठी रेशीम शेतीतून १२ महिने रोख उत्पन्न मिळू शकते. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पुढील १५ वर्षे कोणतीही लागवड करण्याची गरज नाही. तुतीच्या झाडांची मशागत, खत आणि कोष निर्मितीपर्यंतचे चक्र व्यवस्थित सांभाळणे गरजेचे आहे. दर दोन महिन्यांतून एकदा एक उत्पादन घेता येते. तेही केवळ २० टक्के खर्चात असे त्यांनी नमूद केले.

रेशीम कोषाला प्रति किलो ४५० रुपये दररेशीम कोषचा दर हा सोन्यासारखा असतो. आपल्या देशात उत्पादन कमी असल्याने बाराही महिने रेशीमला चांगला भाव मिळतो. जालना येथे रेशीमची बाजारपेठ आहे. शिवाय कर्नाटक राज्यातही रेशीमची खरेदी, विक्री मोठ्या प्रमाणात होते. आज रेशीम कोषाला प्रति किलो ४५० रुपये दर आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद