शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नियम डावलून सत्ताधाऱ्यांच्या महाविद्यालयांना 'पीएम उषा' योजनेचा कोट्यावधींचा निधी

By राम शिनगारे | Updated: March 22, 2024 18:50 IST

मराठवाड्यातील दहा महाविद्यालयांसह राज्यातील ४३ महाविद्यालयांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान’ (पीएम.उषा) योजनेत दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांना पाच कोटी रुपयांपर्यंत निधी मंजूर केला आहे. देशभरातील एकूण ३२१ महाविद्यालयांची निधीसाठी निवड केली असून, त्यात मराठवाड्यातील १०, तर राज्यातील ४३ महाविद्यालयांचा समावेश असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या ४३ महाविद्यालयांमध्ये बहुतांश महाविद्यालये सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. पीएम.उषा योजनेसाठी बनविलेले नियम डावलून सत्ताधाऱ्यांच्या महाविद्यालयांना सढळ हस्ते निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीएम उषा योजनेत विद्यापीठ, महाविद्यालय आणि मॉडेल कॉलेजेसना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासह संशोधन, नवोपक्रम, विविध शैक्षणिक साहित्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव मागविले होते. त्यात पहिल्या टप्प्यात केंद्रीय शिक्षण विभागातील प्रोजेक्ट ॲप्रुव्हल बोर्डाच्या (पीएबी) बैठकीत देशभरातील २२२ शिक्षण संस्थांना ४ हजार ४७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यात महाराष्ट्रातील ११ सार्वजनिक विद्यापीठे, सहा मॉडेल कॉलेज, नव्याने स्थापन झालेले चार क्लस्टर विद्यापीठ अशा एकूण २१ संस्थांना ७८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

'पीएबी'ची दुसरी बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीत देशभरातील ३२१ महाविद्यालयांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यात राज्यातील ४३ महाविद्यालयांचा समावेश आहे. निधीसाठी निवडलेली महाविद्यालये सत्ताधारी पक्षांचे मंत्री, आमदार, खासदारांची आहेत. त्यात काही अपवादात्मक विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, माजी विधानसभाध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, नव्याने भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या महाविद्यालयाचा समावेश आहे. तसेच माजी मंत्री आ. राजेश टोपे यांच्या महाविद्यालयासही पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.

निधी देताना नियमाचा विसर का?महाविद्यालयांना निधी देताना ११ फोकस जिल्ह्यासाठी १०० गुण, पूर्वीच्या 'रुसा' योजनेत निधी मिळाला नसेल तर १०० गुण, २ हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्येसाठी ६० गुण, महाविद्यालयात १५ पेक्षा अधिक विभाग असेल तर ४० गुण, महाविद्यालयातील एकूण प्राध्यापकांच्या ८५ टक्के पदे भरल्यास ३० गुण, विद्यार्थी-प्राध्यापकांच्या गुणोत्तराला ३० गुण आणि स्थानिक उद्योजकांसोबतच्या कराराला २५ गुण दिले होते. एकूण ३८५ गुणांपैकी सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या महाविद्यालयांना निधी मंजूर करण्यात येणार होता. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयाने ३८५ पैकी ३८५ गुण मिळवूनही निधी मंजुरीमध्ये महाविद्यालयाचा समावेश केलेला नाही. तसेच फोकस नसलेल्या जिल्ह्यातील महाविद्यालयांना निधी मंजूर केला आहे. ही महाविद्यालय सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे 'पीएबी'ला निधी मंजूर करताना ठरवून दिलेल्या नियमांचाच विसर पडल्याचेही यादीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण