शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 12:44 IST

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते.

ठळक मुद्दे७२ तासात ऑनलाईन तक्रार केली नसल्याची सबब पुढे करून कंपन्या पीकविम्याचे पैसे देण्यास नकार

औरंगाबाद : गेल्या वर्षी खरीप हंगामात पिकाचे नुकसान झालेल्या उस्मानाबादच्‍या १५ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे.

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. मात्र, ७२ तासात ऑनलाईन तक्रार केली नसल्याची सबब पुढे करून कंपन्या पीकविम्याचे पैसे देण्यास नकार देत आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी कंपन्यांना आदेश देऊ, अशी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, संबंधीत कंपन्यांकडून दखल घेतली गेली नाही. नवनाथ शिंदे, प्रवीण जाधव, किरण जाधव, सज्जन मते, समाधान मते, सचिन काळे, अश्रुबा बीक्कड, सूर्यकांत देशमुख, प्रफुल देशमुख, विकास जाधव, विश्र्वनाथ वाटवडे, योगेश जाधव, बापू जावळे, विश्र्वनाथ जाधवर आणि बाळू केसकर या १५ शेतकऱ्यांनी ॲड. संजय वाकुरे यांच्‍या मार्फत याचिका सादर केली आहे.

कंपनीने फसवे कारण दिल्याचा आरोपउस्मानाबादेत बाधित शेतकऱ्यांची संख्या ४ लाख १६ हजार ६०० इतकी आहे, तर बाधित क्षेत्र २ लाख ६२ हजार ७८५ हेक्टर आहे. यामध्ये जिरायती २ लाख ३० हजार, बागायती २९ हजार ३१३ व फळपिकाचे क्षेत्र ३ हजार १९३ हेक्टर इतके आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार बाधित क्षेत्र २५ टक्क्यांपर्यंत असल्यास कृषी, महसूल विभाग अथवा कंपनी यांच्यापैकी कोणत्याही एका यंत्रणेला पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र, नुकसान २५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास वैयक्तीक तक्रारी करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचा विचार केल्यास ते जवळपास ५२ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे कंपनीने दिलेले कारण हे फसवे आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद