शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ३,५०० कोटींच्या प्लास्टिक उद्योगावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:19 IST

मराठवाड्यात प्लास्टिक उद्योगांतून सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होत असून, शासनाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उद्योगांवर संकट येण्याची शक्यता आहे.

- विकास राऊत  

औरंगाबाद : मराठवाड्यात प्लास्टिक उद्योगांतून सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होत असून, शासनाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उद्योगांवर संकट येण्याची शक्यता आहे. विभागात ३५० हून अधिक लहान-मोठे उद्योग असून, त्यामध्ये अंदाजे ४० हजार जणांना रोजगार मिळतो आहे. प्लास्टिक बंदीचा परिणाम या उद्योगांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक इंडस्ट्री कल्चर रुजलेले आहे. औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीमध्ये १७५ च्या आसपास उद्योग आहेत. जालन्यात ५० उद्योग असतील, तर उर्वरित मराठवाड्यात १२५ हून अधिक उद्योग असतील. या सगळ्या उद्योगांमध्ये कॉस्मो फिल्म आणि गरवारेसारख्या उद्योगांची मोठी उलाढाल आहे.

कॉस्मो फिल्म हा उद्योग सध्या २,५०० कोटींच्या उलाढालीपर्यंत गेला आहे. प्लास्टिकला पर्याय काय आहे, याबाबत शासनस्तरावर अभ्यास सुरू आहे. इतर राज्यांतील प्लास्टिकला उपलब्ध झालेल्या पर्यायांचा आढावा घेण्यासाठी अभ्यास केल्यानंतर राज्यात पूर्णत: प्लास्टिक बंदी करण्याचा विचार शासन दरबारी सुरू आहे. वास्तवत: हे करणे सध्या तरी शक्य नाही. कारण दैनंदिनीमध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मेडिकल्स, आॅटोमाबईल्स सेक्टरमध्ये प्लास्टिक प्रॉडक्टस्चा वापर मोठ्या प्रमाणात आहे. प्लास्टिक उत्पादनांवर आॅटोमोबाईल्स उद्योगांची मोठी साखळी अवलंबून आहे. बजाजसारख्या कंपनीचे १२५ व्हेंडर हे प्लास्टिक निर्मिती करणारे आहेत. पेट बॉटल्सचा ९० टक्के पुनर्वापर होतो, त्यातून स्टेपफायबरही मिळते जे कपड्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. 

प्लास्टिक उत्पादन उद्योजक भरत राजपूत यांनी सांगितले, की नेमकी कोणत्या प्लास्टिकवर बंदी आणायची आहे, हे सरकारने ठरविले पाहिजे. प्लास्टिकला पर्याय काय असावा हेदेखील समोर आणावे लागेल. मेडिकल ते आॅटोबाईल्सपर्यंत अनेक सेक्टरमध्ये प्लास्टिकचा वापर होतो आहे. मराठवाड्यात सुमारे ३५० हून अधिक उद्योग आहेत. त्यातून होणारी उलाढाल आणि रोजगाराचा आकडाही मोठा आहे. पर्यावरणाच्या विरोधातील प्लास्टिक उत्पादने बंद करण्यास हरकत नाही. 

मुंबईत असोसिएशनची बैठक प्लास्टिकचे कप, पत्रावळी, ग्लास, स्ट्रॉ, सर्व प्रकारच्या कॅरीबॅग्स, पॅकेजिंग बॅग्स, कमी मायक्रॉनच्या पेट बॉटल्स, थर्माकोल्सचा कचरा सध्या सर्वत्र दिसतो आहे. याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करण्याचा विचार करीत आहे. दरम्यान, रविवारी मुंबई, दादर येथे ‘राय’ (रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया)ची बैठक झाली. असोसिएशनने पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त सचिव सतीश गवई यांना पत्र देऊन प्लास्टिक  बंदीबाबत २२ मार्च रोजी पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक, ओल्या वस्तू पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकबाबत विवरण दिले आहे. कॅरीबॅग बंदीसाठी असोसिएशन स्वत: जनजागृती करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडाbusinessव्यवसायenvironmentपर्यावरणEmployeeकर्मचारीMIDCएमआयडीसी