शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

उद्योगांपुढे मागणीचे संकट; ३०-४० टक्केच उत्पादन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:25 IST

प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

ठळक मुद्देबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीमागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू

- विजय सरवदे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या उत्पादनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, मोठ्या उद्योगांकडून पुरेशा प्रमाणात मागणी नसल्यामुळे लघु उद्योग धीम्या गतीने सुरू आहेत. प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून संपूर्ण उद्योग ठप्प झाले होते. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेड झोन वगळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चितेगाव, पैठण औद्योगिक परिसरातील उद्योग सुरू झाले. त्यानंतर अलीकडे चौथ्या टप्प्यात शहरातील चिकलठाणा व रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी मिळाली. चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसरात जवळपास साडेचारशे ते पाचशे उद्योग असले तरी आतापर्यंत सव्वादोनशे उद्योग सुरू झालेले आहेत. या परिसरातील उद्योग प्रामुख्याने आॅटोमोबाईल उद्योगांवर अवलंबून आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे दुचाकी, तीनचाकी विक्रीचे शोरूम बंद असल्यामुळे या वाहननिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल कंपन्यांकडून अवलंबित उद्योगांना पुरेशा प्रमाणात मागणी (आॅर्डर) नाही. परिणामी, सध्या मागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतीतीत दीड शिफ्टमध्ये सुमारे तीन ते चार हजार कामगार काम करीत आहेत. औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे जवळपास ५० ते ६० उद्योग बऱ्यापैकी सुरू आहेत. 

बाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन उघडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रामुख्याने वाहन विक्रीचे शोरूम सुरू झाल्यास आॅटोमोबाईल कंपन्या पूर्ण ताकदीने सुरू होतील व या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळतील. आॅटोमोबाईल डीलर्सचे व्यवहार जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत औरंगाबादची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही. सध्या लघु उद्योगांपुढे आॅर्डरची अडचण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना बस, काही जण कारमधून ने-आण करतात. सोमवारपर्यंत कामगारांना दुचाकीवरून येण्यास परवानगी मिळेल. - मनीष अग्रवाल, सचिव, मासिआ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी