शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांपुढे मागणीचे संकट; ३०-४० टक्केच उत्पादन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:25 IST

प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

ठळक मुद्देबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीमागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू

- विजय सरवदे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या उत्पादनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, मोठ्या उद्योगांकडून पुरेशा प्रमाणात मागणी नसल्यामुळे लघु उद्योग धीम्या गतीने सुरू आहेत. प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून संपूर्ण उद्योग ठप्प झाले होते. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेड झोन वगळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चितेगाव, पैठण औद्योगिक परिसरातील उद्योग सुरू झाले. त्यानंतर अलीकडे चौथ्या टप्प्यात शहरातील चिकलठाणा व रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी मिळाली. चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसरात जवळपास साडेचारशे ते पाचशे उद्योग असले तरी आतापर्यंत सव्वादोनशे उद्योग सुरू झालेले आहेत. या परिसरातील उद्योग प्रामुख्याने आॅटोमोबाईल उद्योगांवर अवलंबून आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे दुचाकी, तीनचाकी विक्रीचे शोरूम बंद असल्यामुळे या वाहननिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल कंपन्यांकडून अवलंबित उद्योगांना पुरेशा प्रमाणात मागणी (आॅर्डर) नाही. परिणामी, सध्या मागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतीतीत दीड शिफ्टमध्ये सुमारे तीन ते चार हजार कामगार काम करीत आहेत. औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे जवळपास ५० ते ६० उद्योग बऱ्यापैकी सुरू आहेत. 

बाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन उघडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रामुख्याने वाहन विक्रीचे शोरूम सुरू झाल्यास आॅटोमोबाईल कंपन्या पूर्ण ताकदीने सुरू होतील व या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळतील. आॅटोमोबाईल डीलर्सचे व्यवहार जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत औरंगाबादची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही. सध्या लघु उद्योगांपुढे आॅर्डरची अडचण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना बस, काही जण कारमधून ने-आण करतात. सोमवारपर्यंत कामगारांना दुचाकीवरून येण्यास परवानगी मिळेल. - मनीष अग्रवाल, सचिव, मासिआ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी