शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कुलगुरूंची भेट मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देविद्यापीठ : साडेसात कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळेच कारवाई; विद्यार्थ्यांचा आरोप

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.एम.पी. लॉ महाविद्यालयाने घेतलेल्या सराव परीक्षेत आणि विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतील प्रश्नांमध्ये मोठ्या प्रमाणात साधर्म्य होते. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वच विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यासाठी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे परीक्षा संचालक, प्रकुलगुरूंना निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचे कारण दिल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण करीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारतीच्या बाहेर काढले. यानंतर दुसºया दिवशी विद्यापीठ प्रशासनाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते, अजहर पटेल आदींवर १४३, ५०६ कलामांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कुलगुरूंना विद्यार्थ्यांना भेटण्यास वेळ नाही. मात्र, त्याचवेळी अधिकारी, विशिष्ट व्यवस्थापन सदस्यांसोबत तासन्तास बसण्यासाठी वेळ मिळतो. हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा प्रकार असल्याचे नवनाथ देवकते यांनी सांगितले.चौकट,दुष्काळग्रस्ताच्या शुल्कमाफीच्या घोटाळ्यामुळे कारवाईशैक्षणिक वर्ष २०१४-१५ आणि १५-१६ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शासनाने शुल्कमाफीपोटी दिलेले ७ कोटी ७० लाख रुपये महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाने हडप केले आहेत. या प्रकरणाचा भंडाफोड मराठवाडा लॉ कृती समितीने केला होता. याशिवाय बोगस प्रवेश प्रकरण, पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांना आकरण्यात येणारे अतिरिक्त शुल्क परत करणे, अशा विविध प्रकरणांत लढा दिल्यामुळे २० ते २५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने बदला घेतला असल्याचा अरोप नवनाथ देवकते यांनी केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद