शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Aurangabad Violence : तीन हजार दंगलखोरांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:16 IST

शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

औैरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर अटक केलेल्या २३ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.

औरंगाबादेत उसळलेल्या जातीय दंगलीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहे. शनिवारपासून पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवत संशयीतांची धरपकड सुरू केली आहे. दंगलग्रस्त भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेली माहिती व घटनास्थळावरील पुरावे, यावरून सुमारे तीन हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दंगलीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. सोमवारपासून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. घटनास्थळी असलेले वास्तव व मालमत्ताधारकांनी दिलेल्या बयाणानुसार पंचनामे होतील. त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधणारा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. तर दंगलखोरांना रोखण्यास पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बीपीन बिहारी यांनी दिली.

>राजकीय नेत्याशी पोलिसांची ‘हातमिळवणी’!औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या जातीय दंगलीत पोलिसांसमक्ष वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या दंगलीचे चित्रीकरण केलेला एक व्हिडिओ समोर आला असून त्यात एक राजकीय नेता पोलीस अधिकाऱ्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे.दंगलीचे मुख्य केंद्र नवाबपुरा, राजाबाजार चौकात होते. या भागात दोन्हीकडील हजारो युवक जमा झाले होते. पोलिसांनी नवाबपुरा रोडवर असणारा जमाव अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत, गोळीबार करीत पाठीमागे रेटला. पोलिसांचा ताफा नवाबपुरा रोडवरून जिन्सीकडे निघालेला असताना नेहरू पायजमा घातलेला एक युवानेता एका पोलीस अधिकाºयाशी ‘हात’ मिळवणी करताना व्हिडिओत दिसत आहे. या ‘हातमिळवणी’नंतर अवघ्या काही मिनिटांत चार युवक हातात लोखंडी रॉड घेऊन येतात. ही फोडा..ती फोडा अशी आरडाओरड करत गाड्यांची तोडफोड सुरू होते. तोपर्यंत पोलीस नवाबपुरा रोडवरून पुढे गेलेले असतात. मागे हा गोंधळ सुरू होतो.

>दंगेखोरांना पोलिसांचे संरक्षणपोलीस संरक्षणातच दंगेखोर येतात. पोलीस पुढे निघून गेल्यानंतर मागे निर्मनुष्य रस्त्यावरील गाड्या, दुकाने पेटवून देतात हे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.व्हिडिओ बनविणाºयांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दंगेखोर पोलीस संरक्षणातच जाळपोळ करीत असतील, तर आम्ही काय करावे? कोणाकडे जावे? डोळ्यादेखत आमची गाडी पेटविण्यात आली; मात्र आम्ही काहीही करू शकलो नाही, गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा होता, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

>दंगेखोरांना आम्हीच रोखले - खैरेआमच्यावर जोरदार दगडफेक सुरू होती, दंगेखोरांना रोखण्यासाठी आम्ही धावलो, अन्यथा दंगलखोर गुलमंडी, सराफा, औरंगपुरा आणि पैठणगेटपर्यंतच्या भागात जाळपोळ आणि लुटालूट करण्याच्या तयारीत होते. एवढेच नव्हे तर दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.

>सत्य बाहेर येईल...दंगल का घडली, याला जबाबदार कोण, हा पूर्वनियोजित कट होता का या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीत बाहेर येतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

>खैरे यांच्यावर कारवाई करा : विखेशिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे विशिष्ट समाजाची बाजू घेऊन बोलत आहेत. हे आक्षेपार्ह आहे. हिंमत असेल, तर सरकारने खा. खैरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस