शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

वाळूतस्करांविरूद्ध गुन्हे

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

भोकरदन: तालुक्यात महसूल विभागाने दोन दिवसांपासून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भोकरदन: तालुक्यात महसूल विभागाने दोन दिवसांपासून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.शुक्रवारी उपविभागीय अधिकारी डॉ. एऩआऱ शेळके व तहसीलदार रूपा चित्रक यांनी बाणेगाव, केदारखेडा व गव्हाण संगमेश्वर या ठिकाणी तीन वाहने हे वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या तीन वाहनांविरूध्द राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल आहे.तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा विधानसभेतही गाजला. केदारखेडा, मेरखेडा, वालसा खालसा या ठिकाणी छापे मारून ४०० ब्रास वाळूचा साठा करण्यात आला. दोन जे़सी़बी़पकडले त्यापैकी एका जे़सी़बी़ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी मंडळ अधिकारी के़डी़सोनोवणे, तलाठी अविनाश देवकर, अभय देशपांडे, योगेश नागरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यानी केदारखेडा, बाणेगाव, गव्हाण संगमेश्वर या ठिकाणी जाऊन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता बाणेगाव पाटीवर एम एच ०९ - बी़सी ४३५१, चालक विठ्ठल चुकटे, एम एच - ४ टी पी ९०९८ चालक मोतीराम तेटवार, तसेच एम एच १५ - बी़जे ४४६७ या गाड्यांची तपासणी केली. दोन्ही ट्रक चालकांजवळील आढळलेल्या पावत्यांमध्ये खाडाखोड होती. एका ट्रकने महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. मंडळ अधिकारी सोनोवणे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. भोकरदन तालुक्यातून सिल्लोड, बुलडाण्यासह इतर ठिकाणी वाळूचा पुरवठा करण्यात येतो. वाळू वाहतुकीसाठी विनाक्रमांकाच्या वाहनांचा वापर करण्यात येतो. या प्रकाराडे पोलिस तसेच महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. तहसीलदार रूपा चित्रक यांनी सांगितले की, वाळूच्या गाड्यांची तपासणी करण्यासाठी गेल्यावर बहुतांश गाड्यांना नबंर नसतो. शिवाय काही गाड्यांवर ज्या-त्या पक्षांची चिन्हे लावलेली असतात. कारवाई करण्यासाठी गेलो असता गाडीचा क्रमांक दिसत नाही व गाडी पळून गेली तर नेमकी कारवाई कोणावर करावी, हे कळत नाही. तहसील कार्यालयाच्या वतीने आऱटी़ओ़ना यासंबंधी पत्र देणार असल्याचे चित्रक यांनी सांगितले.महसूल विभागाच्या वतीने १४ जून रोजी एका जे़सी़बी़वर कारवाई केली. ते जे़सी़बी़ शेतकऱ्यांची पाईप लाईन खोदण्याचे काम करीत असताना उपविभागीय अधिकारी डॉ. शेळके यांनी पकडले. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख माधवराव हिवाळे यांनी सांगितले़ दरम्यान, महसूल व पोलिसांच्या कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)पोलिसांची ३० वाहनांवर कारवाईतालुक्यात खाजगी वाहने, अ‍ॅपेमधून वाळूची वाहतूक होती. तीन दिवसांत ३० वाहनांवर करवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली.हिवाळे म्हणाले की पूर्णा ,गिरजेच्या पात्रातून सर्रास पणे वाळूचा उपसा होतो. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खरी माहिती देण्याची गरज आहे. जर संबंधीत जे़सी़बी़ खरोखरच वाळू भरताना पकडले असेल तर आमचे काही म्हणने नाही मात्र प्रकार तसा नसताना सुद्धा कारवाई करण्यात आली. महसूल व पोलिसांनी शेतकऱ्यांचाही विचार करावा.