शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

‘आयव्हीएफ’द्वारे तयार होतील ५० लीटर दूध देणाऱ्या गायी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंटर सुरू

By विजय सरवदे | Updated: February 15, 2024 11:22 IST

दुग्धव्यवसायात पुढचे पाऊल; मराठवाड्यात प्रथमच खांडी पिंपळगावालगत डोंगरावर साकारला प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत ‘आयव्हीएफ सेंटर’च्या माध्यमातून मुले जन्माला घातली जातात, हे ऐकले आहे; पण या पद्धतीने जास्त क्षमतेने दूध देणाऱ्या गायी जन्माला घातल्या जातात, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. होय, हे खरे आहे. शहरापासूनच जवळच खांडी पिंपळगावच्या डोंगरावर ‘भद्रा ब्रिडिंग सेंटर’ अर्थात आयव्हीएफ प्रयोगशाळा साकारली आहे. या प्रकल्पात ५० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या विदेशी गायीच्या वंशावळीतील वळूचे वीर्य व आपल्याकडील उच्च प्रतीच्या गायीची बिजांडे प्रयोगशाळेत एकत्र रुजवून त्याद्वारे गर्भ तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन-तीन महिन्यांत तयार झालेला हा गर्भ सर्वसाधारण गायीच्या पोटात वाढविला जाणार आहे.

दुग्धव्यवसाय हा जोडधंदा नव्हे, तर मुख्य व्यवसाय व्हावा, या दिशेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुपुत्र व नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बी.बी. चव्हाण यांनी हे पाऊल टाकले आहे. शुक्रवारी या ‘भद्रा ब्रिडिंग सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय ‘आयव्हीएफ’ प्रकल्पाचे प्रमोटर व भारत सरकारच्या भ्रूण प्रत्यारोपण विभागाचे मुख्य सल्लागार श्याम झंवर यांच्या हस्ते झाले. झंवर हे सध्या देशातील ४४ ‘आयव्हीएफ’ अर्थात पशू भ्रूण प्रत्यारोपण केंद्रांचे सल्लागार म्हणून काम बघतात.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन व वंश सुधारणा योजनेच्या आर्थिक सहयोगातून खांडी पिंपळगावच्या डोंगरावर डॉ. चव्हाण यांनी उच्च प्रत आणि जास्तीचे दूध देणारा अत्याधुनिक गाेपालन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात जवळपास पाच- सहाशे गायी असून त्यापैकी दीडशे गिर गायी, दोनशे विदेशी आणि दोनशे कालवडी आहेत. मागील दोन- तीन वर्षांपूर्वी गोदरेज, रेमण्ड ग्रुपच्या ‘आयव्हीएफ सेंटर’मध्ये जास्त दूध देणाऱ्या गायीचे भ्रूणाद्वारे जन्माला आलेल्या शंभर देशी- विदेशी गायी सध्या या प्रकल्पात आहेत. त्यापैकी काही गायी ५८ लिटरपर्यंत दूध देत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी या आयव्हीएफ प्रयोगशाळेत जास्त दूध देणाऱ्या सुमारे शंभर गायीची बिजांडे काढली असून १० फेब्रुवारी रोजी त्यात उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य टाकून रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तयार होणारे भ्रूण १६ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण गायीच्या पोटात प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यानंतर दोन- तीन महिन्यांत या गाभण गायी मागणीनुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

जैविक सुरक्षितता असलेला देशातील पहिला प्रकल्पखांडी पिंपळगावच्या डोंगरावरील ‘गोपालन प्रकल्प’ व भद्रा ब्रिडिंग आयव्हीएफ सेंटर’ हा देशातील पहिला जैविक सुरक्षितता असलेला प्रकल्प आहे, हे श्याम झंवर यांनी काल जाहीर केले. या प्रकल्पातील गायींना बाहेरची कोणतीही जनावरे किंवा माणसांचाही संपर्क येत नाही. त्यामुळे लम्पीसारख्या साथरोगाची लागण येथील जनावरांना झाली नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmilkदूध