शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘आयव्हीएफ’द्वारे तयार होतील ५० लीटर दूध देणाऱ्या गायी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंटर सुरू

By विजय सरवदे | Updated: February 15, 2024 11:22 IST

दुग्धव्यवसायात पुढचे पाऊल; मराठवाड्यात प्रथमच खांडी पिंपळगावालगत डोंगरावर साकारला प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत ‘आयव्हीएफ सेंटर’च्या माध्यमातून मुले जन्माला घातली जातात, हे ऐकले आहे; पण या पद्धतीने जास्त क्षमतेने दूध देणाऱ्या गायी जन्माला घातल्या जातात, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. होय, हे खरे आहे. शहरापासूनच जवळच खांडी पिंपळगावच्या डोंगरावर ‘भद्रा ब्रिडिंग सेंटर’ अर्थात आयव्हीएफ प्रयोगशाळा साकारली आहे. या प्रकल्पात ५० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या विदेशी गायीच्या वंशावळीतील वळूचे वीर्य व आपल्याकडील उच्च प्रतीच्या गायीची बिजांडे प्रयोगशाळेत एकत्र रुजवून त्याद्वारे गर्भ तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन-तीन महिन्यांत तयार झालेला हा गर्भ सर्वसाधारण गायीच्या पोटात वाढविला जाणार आहे.

दुग्धव्यवसाय हा जोडधंदा नव्हे, तर मुख्य व्यवसाय व्हावा, या दिशेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सुपुत्र व नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बी.बी. चव्हाण यांनी हे पाऊल टाकले आहे. शुक्रवारी या ‘भद्रा ब्रिडिंग सेंटर’चे लोकार्पण राष्ट्रीय ‘आयव्हीएफ’ प्रकल्पाचे प्रमोटर व भारत सरकारच्या भ्रूण प्रत्यारोपण विभागाचे मुख्य सल्लागार श्याम झंवर यांच्या हस्ते झाले. झंवर हे सध्या देशातील ४४ ‘आयव्हीएफ’ अर्थात पशू भ्रूण प्रत्यारोपण केंद्रांचे सल्लागार म्हणून काम बघतात.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन व वंश सुधारणा योजनेच्या आर्थिक सहयोगातून खांडी पिंपळगावच्या डोंगरावर डॉ. चव्हाण यांनी उच्च प्रत आणि जास्तीचे दूध देणारा अत्याधुनिक गाेपालन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात जवळपास पाच- सहाशे गायी असून त्यापैकी दीडशे गिर गायी, दोनशे विदेशी आणि दोनशे कालवडी आहेत. मागील दोन- तीन वर्षांपूर्वी गोदरेज, रेमण्ड ग्रुपच्या ‘आयव्हीएफ सेंटर’मध्ये जास्त दूध देणाऱ्या गायीचे भ्रूणाद्वारे जन्माला आलेल्या शंभर देशी- विदेशी गायी सध्या या प्रकल्पात आहेत. त्यापैकी काही गायी ५८ लिटरपर्यंत दूध देत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी या आयव्हीएफ प्रयोगशाळेत जास्त दूध देणाऱ्या सुमारे शंभर गायीची बिजांडे काढली असून १० फेब्रुवारी रोजी त्यात उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य टाकून रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तयार होणारे भ्रूण १६ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण गायीच्या पोटात प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यानंतर दोन- तीन महिन्यांत या गाभण गायी मागणीनुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

जैविक सुरक्षितता असलेला देशातील पहिला प्रकल्पखांडी पिंपळगावच्या डोंगरावरील ‘गोपालन प्रकल्प’ व भद्रा ब्रिडिंग आयव्हीएफ सेंटर’ हा देशातील पहिला जैविक सुरक्षितता असलेला प्रकल्प आहे, हे श्याम झंवर यांनी काल जाहीर केले. या प्रकल्पातील गायींना बाहेरची कोणतीही जनावरे किंवा माणसांचाही संपर्क येत नाही. त्यामुळे लम्पीसारख्या साथरोगाची लागण येथील जनावरांना झाली नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmilkदूध