शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मनपाच्या पाण्यावर ‘कुटीर’ उद्योग

By admin | Updated: May 5, 2016 01:28 IST

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टीच्या माध्यमातून

औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबादेत पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टीच्या माध्यमातून मनपाला अर्धीही रक्कम मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करून मनपा प्रशासन मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांची तहान भागवित आहे. मनपाच्या शुद्ध पाण्यावर काही नागरिकांनी कुटीर उद्योग सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वत: मनपा आयुक्तांनी या खळबळजनक घटनेवर प्रकाश टाकला, हे विशेष.बुधवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया मनपा अधिकाऱ्यांसह पैठणगेट भागातील औषधी भवनची इमारत पाहण्यासाठी गेले. इमारतीच्या खालून पाण्याचा प्रवाह मागील काही वर्षांपासून बंद झाला आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याला नैसर्गिक प्रवाह कसा मिळवून देता येईल, यासाठी आयुक्तांनी पाहणी केली. पाहणी करीत असताना दलालवाडी रोडवर एक अर्धे शटर लावलेल्या दुकानात पाण्याचे जार भरण्यात येत होते. एवढ्या गजबजलेल्या भागात पाण्याचे जार कशा पद्धतीने भरले जात असतील असा प्रश्न आयुक्तांना पडला. त्यांनी लगेचच दुकानात धाव घेतली. दुकानातील दृश्य पाहून आयुक्तांसह मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले. महापालिकेच्या पाण्यावर हा जार विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या लाईनमधून मोठा नळ घेण्यात आला आहे. नळाद्वारे पाणी एका हौदात पडत होते. हौदातील पाणी थेट जारमध्ये भरून विक्री करण्यात येत होते. सुनील देवडा हे व्यावसायिक पाण्याची विक्री करीत होते.एवढ्या राजरोसपणे पाण्याची विक्री सुरू असतानाही मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कशी कळाली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील अनेक हॉटेलला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेतले आहेत. महापालिकेने या गंभीर प्रकाराकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे शहरात वॉशिंग सेंटरची संख्याही जवळपासन शंभरच्या वर गेली आहे. या व्यावसायिकांकडे पाणी येते तरी कोठून, याचा तपास मनपाने कधीच केला नाही. अनेक वॉशिंग सेंटरचालक मनपाच्याच पाण्याचा वापर करीत आहेत.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मनपाचे पाणी विकणाऱ्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते.