शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खर्च अवाढव्य तर वसुली तळाला; औरंगाबाद मनपाची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:03 IST

महापालिकेचा दररोजचा खर्च ३५ लाख आणि उत्पन्न ८ लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार चार महिन्यांपासून थांबवून ठेवण्यात आला आहे. हीच अवस्था आणखी काही महिने राहिल्यास मनपा दिवाळखोरीत निघाल्याचे घोषित करावे लागेल.

औरंगाबाद : महापालिकेचा दररोजचा खर्च ३५ लाख आणि उत्पन्न ८ लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे. विकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार चार महिन्यांपासून थांबवून ठेवण्यात आला आहे. हीच अवस्था आणखी काही महिने राहिल्यास मनपा दिवाळखोरीत निघाल्याचे घोषित करावे लागेल. दरमहिन्याला शासनाकडून येणाऱ्या २० कोटींच्या निधीतून विकास कामे कारावीत, कर्मचाऱ्यांचा पगार, अत्यावश्यक खर्च प्रशासनाने मालमत्ता वसुली करून भागवावा, असे पत्र आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना दिले. सत्ताधाऱ्यांनीच यंदा १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करून विकास कामांचा डोंगर रचला आहे. 

मागील सहा महिन्यांपासून महापालिका प्रशासन कचरा प्रश्नात गुंग आहे. मालमत्ता कर, नगररचना, अग्निशमन विभाग, मालमत्ता विभागाकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती चक्क व्हेंटिलेटरवर आली आहे. दररोज आठ ते दहा लाख रुपये तिजोरीत येत आहेत.कर्मचाऱ्यांचा पगार, अत्यावश्यक खर्चासाठी दररोज किमान ३५ लाख रुपये लागतात. तिजोरीत पैसेच येत नसल्याने मागील चार महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारही करण्यात आलेला नाही. कंत्राटी कर्मचारी सध्या बंडाचा झेंडा रोवण्याच्या प्रयत्नात आहेत. खिशातील पैसे खर्च करून ज्या कंत्राटदारांनी विकास कामे केली त्यांचीही बिले चार महिन्यांपासून थांबवून ठेवण्यात आली आहेत. सध्या नवीन कामे घेण्यास कंत्राटदार तयार नाहीत. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

वसुली करून पगार द्याजीएसटीचा वाटा म्हणून राज्य शासनाकडून दरमहिन्याला २० कोटी रुपये मनपाला प्राप्त होतात. या निधीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदी अत्यावश्यक खर्च भागविण्यात येतो. शासनाकडून येणारा निधी विकास कामांसाठी वापरण्यात यावा. मालमत्ता कराची वसुली वाढवून पगार, अत्यावश्यक खर्च भागवावा, अशी मागणी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली. दर महिन्याला वेळेवर पगार होत असल्याने अधिकारी, कर्मचारी वसुलीकडे लक्षच देण्यास तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

आयुक्त करणार खर्चात काटकसरबचत गटाच्या कर्मचाऱ्यांना महिना २० हजार रुपये पगार देण्याचा धक्कादायक निर्णय घेऊन प्रशासनाने दरमहा ३० लाख रुपयांचा खर्च वाढवून ठेवला आहे. भाडे पद्धतीवर घेण्यात आलेल्या रिक्षांमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचीही अवस्था तशीच आहे. जिथे गरज नाही, तिथे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे मनपा आयुक्त आता प्रत्येक बारीकसारीक खर्चाचा तपशील पाहून काटकसर सुरू करणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद