शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

नगरसेवक गेले सहलीवर

By admin | Updated: January 14, 2016 23:14 IST

सेनगाव : नगर पंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मनसे, शिवसेना हे दोन पक्ष सेनगावात किंगमेकर बनले असून काँग्रेस, मनसे, शिवसेना ही युती निश्चित झाली आहे.

सेनगाव : नगर पंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मनसे, शिवसेना हे दोन पक्ष सेनगावात किंगमेकर बनले असून काँग्रेस, मनसे, शिवसेना ही युती निश्चित झाली आहे. खबरदारी म्हणून तीन्ही पक्षाचे सदस्य सहलीवर पाठविले आहेत.कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पहिला नगराध्यक्ष कोण होणार? याबद्दल राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे. कुठल्याही स्थितीत भाजप-राष्ट्रवादीची सत्ता येवू द्यायची नाही, याकरिता मनसे, शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होत आहे.या घडामोडीच्या अनुषंगाने काँग्रेस-सेना-मनसे ही युती जवळपास निश्चित झाली आहे. या तीन पक्षांच्या युतीमध्ये सुरूवातीला काँग्रेस पक्षाचा सव्वा वर्षे नगराध्यक्ष त्यानंतर सव्वा वर्षाकरिता शिवसेनेचा नगराध्यक्ष तर अडीच वर्षे मनसेचा उपनगराध्यक्ष असा अलिखीत निर्णय शहरातील तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या तीन्ही पक्षांचे संख्याबळ नऊ होते तर विरोधी बाकावर असणाऱ्या भाजप- राष्ट्रवादी या दोघांचे संख्याबळ आठ होते. सत्ताधारी- विरोधी समिकरणात केवळ एका जागेचा फरक असल्याने कोणताही दगा फटका होवू नये, याकरिता काँग्रेस-मनसे-सेना या पक्षाचे आठ सदस्य बुधवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष होण्यासाठी विलास खाडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांच्या पत्नी तारामती देशमुख यांनी दावा केला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. काँग्रेस-मनसे- सेना युती जवळपास निश्चित झाली असली तरी भाजप- राष्ट्रवादीकडून ही बहुमताचा जादूई संख्येकरिता प्रयत्न चालविले जात आहेत. त्यामुळे सेनगाव नगर पंचायतचे राजकारण तापले आहे. (वार्ताहर)