शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:10 IST

पैठण तालुक्यातील सुलतानपूरचे ग्रामस्थ सापडले कात्रीत

ठळक मुद्देगावकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहिर’

- सुनील गिऱ्हे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांची संबध येऊ नये, म्हणून शेताचा रस्ता धरलेल्या नागरिकांना चोरांच्या भीतीमुळे पुन्हा गावची वाट धरावी लागली आहे. एकूणच ‘इकडे आड तिकडे विहिर’ या म्हणीप्रमाणे पैठण तालुक्यातील सुलतानपूरच्या (गारखेडा) नागरिकांची अवस्था झाली असून ज्या गोष्टीपासून नागरिक दुर जात होते. त्याच गोष्टीचा पुन्हा सामना करावा लागणार असल्याने ग्रामस्थांसमोर पेच निर्माण झाला आहे.------------------रांजणगाव दांडगा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास दिडशे उंबºयांचे सुलतानपूर (गारखेडा) हे गाव सोलापूर-धुळे माहामार्गापासून १५ कि़मी. अंतरावर असून येथील बहुतांश नागरिक शेतीवर आपला उदारनिर्वाह चालवितात. काही तूरळक नागकिर मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी काम करून उपजीविका भागवितात. कोरोनाच्या पार्श्वभूमीर सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गावात झंजट नको म्हणून येथील बहुतांश कुटूंबियांनी जवळपास महिनाभरापासून आपले बस्तान गावातून शेतात हलविले होते. मात्र, २० एप्रिल रोजी रात्री शेतकरी तुकाराम दौंड यांच्या शेतात चोर आल्याची घटना घडली. लोखंडी पेटीचा आवाज आल्याने शेतकऱ्याला जाग आली. आरडोओरड झाल्याने चोरटे मोसंबीच्या बागेत पळून गेले. या घटनेची माहिती गावासह शेतात राहणाºया नागरिकांत वाऱ्यासारखी परसली.  या घटनेनंतर शेतात राहणाऱ्या चार ते पाच कुटूंबियांनी रातोरात चोरांच्या भीतीने शेतातून गाव गाठले तर काही नागरिकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आपले बस्तान गावात हलविले. सध्या केवळ जे शेतकरी गटा गटाने वास्तव्यास आहेत. तेच शेतात राहायला असून ज्या शेतकºयांचे एकच कुटूंब शेतात गेले होते. त्या सर्वांनी आता गाव जवळ करणेच पसंत केले आहे. 

 ६० टक्के नागरिकांचे स्थलांतर - सुलतानूपर येथील जवळपास ६० टक्के नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने शेतात आपला संसार थाटला होता. मात्र, चोरांची आवई उठल्याने २५ ते ३० टक्के नागरिक पुन्हा गावात आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गावातील गर्दीपासून दुर जाण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा चोरांच्या भीतीमुळे गावात यावे लागत असल्याने येथील                                     पोलीस पाटील महादेव दौंड, ग्रा.पं. सदस्य अजिनाथ दौंड, भारत दौंड, नितीन दौंड, यांनी खंत व्यक्त केली.

पुन्हा भर दिवसा चोरी-विशेष म्हणजे गुरूवारी पुन्हा गावात भर दिवसा चोरी झाल्याने गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, गावातीच व्यक्तीने पाळत ठेवून हे कृत्य केल्याचे उघड झाले. यानंतर सदर व्यक्तीने चोरी केल्याचे कबुल करून मुद्देमाल परत केल्याने त्याच्याविरूद्ध फिर्याद देण्यात आली नाही. या घटनेनंतर पुन्हा शेताततून गावात येणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

नाईलाजाने यावे लागले शेतातून घरी - गावात चार ते पाच जण होम क्वारंटाईन होते. त्यांच्यासह गावातील इतर लोकांशी संपर्क येऊ नये, म्हणून अनेकांनी शेतात संसार थाटला होता. मात्र, चोरींच्या घटनेमुळे बहुतांश नागरिकांना मजबुरीने पुन्हा गावात यावे, लागत असल्याची प्रतिक्रिया गजानन दौंड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादtheftचोरी