शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी वैजापूरकर सरसावले;पाळला एकदिवसीय कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:49 IST

ग्रामीण भागातही शिऊर, विरगाव पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांनी व्यवहार बंद ठेऊन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. 

वैजापूर : शहर व ग्रामीण भागात मंगळवारी (२१एप्रिल ) लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते सकाळपासुनच निर्जन होते. मेडिकल, खासगी दवाखाने व उपजिल्हा रुग्णालय वगळता सर्व व्यवहार संपुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागातही शिऊर, विरगाव पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांनी व्यवहार बंद ठेऊन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. 

करोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी संपुर्ण जिल्हा बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्याअनुषंगाने वैजापुरचे उपविभागिय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊरचे एपीआय सत्यजित ताईतवाले, विरगावचे एपीआय विश्वास पाटील यांनी नागरिकांचा जमाव व गर्दी होऊ नये म्हणुन सोमवारी सतर्कतेचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये योग्य संदेश पोहचुन त्याचा परिणाम मंगळवारी दिसुन आला. 

एरव्ही फुटपाथ वर ठिकठिकाणी बसणारे भाजी विक्रेते, रस्त्याच्या बाजुला असणारे फळविक्रेते, दुधविक्रेते, पिण्याच्या पाण्याचे जार वाहणारी वाहने रस्त्यावरुन गायब झाली होती. त्यांनी बंदमध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या टिक रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. आंबेडकर चौक, जामा मशिद, स्टेशन रोड, राजपूत मढी, गंगापूर रस्ता या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी खंडाळा, शिऊर, गारज आदी भागात भेट देऊन आढावा घेतला. ग्रामीण भागात लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद