शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

CoronaVirus : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी वैजापूरकर सरसावले;पाळला एकदिवसीय कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:49 IST

ग्रामीण भागातही शिऊर, विरगाव पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांनी व्यवहार बंद ठेऊन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. 

वैजापूर : शहर व ग्रामीण भागात मंगळवारी (२१एप्रिल ) लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते सकाळपासुनच निर्जन होते. मेडिकल, खासगी दवाखाने व उपजिल्हा रुग्णालय वगळता सर्व व्यवहार संपुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागातही शिऊर, विरगाव पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांनी व्यवहार बंद ठेऊन घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. 

करोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी संपुर्ण जिल्हा बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्याअनुषंगाने वैजापुरचे उपविभागिय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊरचे एपीआय सत्यजित ताईतवाले, विरगावचे एपीआय विश्वास पाटील यांनी नागरिकांचा जमाव व गर्दी होऊ नये म्हणुन सोमवारी सतर्कतेचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये योग्य संदेश पोहचुन त्याचा परिणाम मंगळवारी दिसुन आला. 

एरव्ही फुटपाथ वर ठिकठिकाणी बसणारे भाजी विक्रेते, रस्त्याच्या बाजुला असणारे फळविक्रेते, दुधविक्रेते, पिण्याच्या पाण्याचे जार वाहणारी वाहने रस्त्यावरुन गायब झाली होती. त्यांनी बंदमध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या टिक रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. आंबेडकर चौक, जामा मशिद, स्टेशन रोड, राजपूत मढी, गंगापूर रस्ता या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी खंडाळा, शिऊर, गारज आदी भागात भेट देऊन आढावा घेतला. ग्रामीण भागात लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद