शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:45 IST

या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देउद्योग, व्यापाराला दिलासा दिल्लीहून आले ५१ प्रवासीऔरंगाबादहून दिल्लीला २९ प्रवासी रवाना

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल ३ महिन्यानंतर शुक्रवारी इंडिगोच्या दिल्ली - औरंगाबाद विमानाने दुपारी २.२० वाजता ५१ प्रवासी शहरात दाखल झाले. तर २९ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले. या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

तब्बल ३-महिन्यांनंतर विमानतळ प्रवाशांच्या गर्दीने गजबजले. विमानतळावर दाखल प्रत्येक प्रवाशाच्या शरीराच्या तापमानाची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सायनिटायजर, फेश शिल्ड देण्यात आली. दुपारी ३.१० वाजता या विमानाने दिल्लीसाठी टेकऑफ घेतले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या ३ महिन्यांपासून विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. 

जुलै ऐवजी जूनपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर शुक्रवारपासून उड्डाण सुरू केले. हे विमान दिल्लीहून रोज दुपारी १२.२५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी २.२० वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर हे विमान दुपारी ३.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सायंकाळी ५.०५ वाजता दिल्लीत दाखल होईल.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdelhiदिल्ली