शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:45 IST

या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देउद्योग, व्यापाराला दिलासा दिल्लीहून आले ५१ प्रवासीऔरंगाबादहून दिल्लीला २९ प्रवासी रवाना

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल ३ महिन्यानंतर शुक्रवारी इंडिगोच्या दिल्ली - औरंगाबाद विमानाने दुपारी २.२० वाजता ५१ प्रवासी शहरात दाखल झाले. तर २९ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले. या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

तब्बल ३-महिन्यांनंतर विमानतळ प्रवाशांच्या गर्दीने गजबजले. विमानतळावर दाखल प्रत्येक प्रवाशाच्या शरीराच्या तापमानाची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सायनिटायजर, फेश शिल्ड देण्यात आली. दुपारी ३.१० वाजता या विमानाने दिल्लीसाठी टेकऑफ घेतले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या ३ महिन्यांपासून विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. 

जुलै ऐवजी जूनपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर शुक्रवारपासून उड्डाण सुरू केले. हे विमान दिल्लीहून रोज दुपारी १२.२५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी २.२० वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर हे विमान दुपारी ३.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सायंकाळी ५.०५ वाजता दिल्लीत दाखल होईल.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdelhiदिल्ली