शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:17 IST

औरंगाबाद - दिल्ली विमानसेवा : विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली, उद्योजकांच्या प्रयत्नांना यश

ठळक मुद्देकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विमानतळावरून १७ जूनपासून औरंगाबाद - दिल्ली विमानसेवेचे उड्डाण होणार आहे. यासाठी इंडिगोने बुकिंग सुरू केली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. जुलैऐवजी जूनपासून औरंगाबादहुन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. याविषयी काय निर्णय घेण्यात येतो, याकडे लक्ष लागले होते.

मुंबईसह विविध शहरांतून २५ मे पासून विमानांचे उड्डाण सुरू झाले. परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. औरंगाबादची विमानसेवा वेटिंगवर होती. दुसरीकडे दिवसाला सुमारे तीनशे रुग्णांची वाढ होणाऱ्या पुणे शहरातून विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, दुसरीकडे दिवसभरात अवघे काही रूग्ण वाढणाऱ्या औरंगाबादेत विमानसेवा का सुरु केली जात नाही, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला होता. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक