शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

coronavirus : मराठवाड्यात रेमडेसिविरसाठी ‘तारेवरची कसरत’; दररोजची गरज सात हजारांची मिळतात दोन हजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:34 IST

coronavirus : मराठवाड्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णनातेवाईक औरंगाबादपर्यंत धावपळ करीत आहेत, तर दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार, चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देएकूण रुग्णांपैकी २५ टक्के गंभीर रुग्णाचा अंदाज आहे.विभागात इंजेक्शन मिळण्यात अडचणी

- विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यात ३ मे रोजी दुपारपर्यंत सहा हजार ५००च्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. विभागात असलेल्या रुग्णांच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा एकाही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल आणि हवालदिल झाली आहे, तर इंजेक्शनसाठी रुग्णनातेवाइकांची सर्वत्र धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. रोज सात हजार इंजेक्शनची गरज असताना दोन हजार इंजेक्शन्स सध्या येत आहेत. परिणामी पुरवठा आणि मागणीतील तफावतीमुळे यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू आहे.

मराठवाड्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णनातेवाईक औरंगाबादपर्यंत धावपळ करीत आहेत, तर दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार, चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बनावट इंजेक्शनदेखील या महामारीत विकण्याच्या घटना समोर येत आहेत. असे असताना गंभीर रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा ५० टक्केच होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुग्ण नातेवाईक हताश होत आहेत.

गरज होती एक लाख इंजेक्शनची दिले ३० हजारमागील पंधरा दिवसांत मराठवाड्याला रोज दोन हजार याप्रमाणे ३० हजार इंजेक्शन मिळाले आहेत. रोज सात हजार इंजेक्शनची विभागाची गरज आहे. त्या तुलनेत फक्त दोन हजार इंजेक्शन मिळत असल्यामुळे तारेवरची कसरत प्रशासकीय यंत्रणेला करावी लागते आहे. सध्या मराठवाड्यात सरकारी दवाखान्यात दहा हजार ३६८ आणि खासगी रुग्णालयात ७०२ इंजेक्शन उपलब्ध आहेत. इंजेक्शन मिळण्यात विभाग मागे आहे, कारण दोन कंपन्यांचा साठा येत आहे.

इंजेक्शन परिणामकारक आहेडॉ.आशिष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, रेमडेसिविर इंजेक्शन परिणामकारक आहे. ताप कमी होत नसेल आणि कफ वाढत असेल तर रुग्णाच्या प्रकृतीचे गांभीर्य पाहून पहिल्या दिवशी दोन आणि त्यापुढील तीन दिवस एकेक इंजेक्शनचा डोस देण्यात येतो. पाच ते सहा इंजेक्शन एका रुग्णासाठी लागतात.

विभागात इंजेक्शन मिळण्यात अडचणीविभागात शासकीय स्टोअरमध्ये कमी प्रमाणात इंजेक्शन सोमवारी उपलब्ध होते. रुग्णसंख्या आणि इंजेक्शन तुलनेते साठा कमी झाल्यामुळे परिस्थिती बिकट असल्याचे अन्न व औषधी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जालन्यातून रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटपएकट्या जालना शहराला ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आल्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुमोटो याचिकेत उपस्थित करण्यात आला. त्यावर सरकारने मान्य केले की, जालन्याला ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले. तेथून इंजेक्शनचा पुरवठा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

रुग्ण आणि इंजेक्शनची टक्केवारीएकूण रुग्णांपैकी २५ टक्के गंभीर रुग्णाचा अंदाज आहे. सहा हजार ५०० रुग्णांच्या तुलनेत आजच्या स्थितीला पहिला डोस देण्यासाठी १५०० इंजेक्शन विभागाला आवश्यक आहेत. पाच दिवसांचे डोस मिळून ७ ते ८ हजार इंजेक्शन विभागात असणे आवश्यक आहे. परंतु सोमवारी कुठेही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने परिस्थिती बिकट झाल्याचे दिसते आहे.

विभागीय आयुक्तांनी काय प्रयत्न केलेबेड्स, ऑक्सिजन आणि इंजेक्शन उपलब्धतेसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सर्व यंत्रणेच्या संपर्कात आहेत. त्यांनी विभागाला जास्तीत जास्त इंजेक्शनचा साठा मिळावा यासाठी अन्न व औषधी विभागाच्या वरिष्ठांकडेदेखील मागणी केली. मराठवाड्यात इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी रेमडेसिविरचे इन्चार्ज विजय वाघमारे यांच्याकडून जास्तीचा साठा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्व विभागासह अहमदनगरसाठी इंजेक्शनचा साठा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दररोज २५० ते ३००च्या वर इंजेक्शन पुरवठा केला जात नाही.

मराठवाड्यातील ३ मे दुपारपर्यंतची रुग्णसंख्यारुग्णसंख्या शहर ग्रामीणऔरंगाबाद- ------- ३७३- ४६२जालना---------- ००० -८९८परभणी--------- ४३६ -३८५हिंगोली--------- ००० -२४९नांदेड---------- १३६- ३५८बीड----------- ००० -१३४५लातूर---------- २७९ -७४८उस्मानाबाद------ ००० -५८७एकूण --------- १२२४ -५०३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा