शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : 'ट्रेस-टेस्ट-आयसोलेट'मध्ये औरंगाबाद महापालिका देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 17:33 IST

औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरशहरात पॉझिटिव्हची टक्केवारी २८ वरून ११ वर आली 

औरंगाबाद :  कोविड-१९ मध्ये गत चार महिन्यांत महापालिकेने प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला. टीटीआय (ट्रेस-टेस्ट-आयसोलेट) म्हणजेच रुग्ण शोधणे, त्याची तपासणी करणे आणि वेळीच उपचार करणे यामध्ये औरंगाबाद शहराने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. औरंगाबादेत ६६ हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत १ लाख तपासण्या पूर्ण होतील, असा विश्वास महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णवाढीची टक्केवारी २८ वरुन ११ टक्क्यांवर आली आहे.  टीटीआयमध्ये गोवा राज्य प्रथम आहे.

दहा लाख नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून तपासणीचे हे गणित अधिक तपशीलवार समजावून सांगताना पाण्डेय यांनी नमूद केले की, दिल्लीत दहा लाख नागरिकांमागे ४३ हजार, जम्मू- काश्मीरमध्ये ३८ हजार, आंध्र प्रदेशमध्ये २५ हजार, राजस्थान १६ हजार, महाराष्ट्र १४ हजार नागरिकांच्या तपासण्या होतात. औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण आता ३.७ टक्क्यांवर आले आहे. मागील महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के होते. आता हे प्रमाण ११ टक्क्यांवर आले आहे. 

कोरोनातील ७ प्रभावी कामेऔरंगाबाद महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये आता ३५ कर्मचारी काम करीत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, मॅपिंग, हाय रिस्क रुग्णांचा शोध घेण्याची पद्धत इतर कोणत्याच महापालिकेत नाही. २४ तास ७ दिवस सतत कंट्रोल रूम सुरू असून, याद्वारे अनेक कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात येत आहेत. मोबाईल फिव्हर क्लीनिक, १ लाख ४ हजार ८७९ ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवण्याचे काम येथूनच होते. अनेकदा डॉक्टरसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात. एमएचएमएच अ‍ॅप तयार करून द्या, अशी मागणी राज्यातील पाच महापालिकांनी केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांची स्वतंत्रपणे तपासणी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे. 

खर्च ३ हजारांवरून ५०० रुपयेलाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचा एका व्यक्तीचा खर्च तीन हजार रुपये आहे. अँटिबॉडीज टेस्ट या प्रकाराचा खर्चही ३ हजार रुपयांपर्यंत जात आहे. अँटिजन टेस्ट (आरटीपीसीआर) ५०० रुपयांमध्ये होत आहेत. भविष्यात व्यापारी आणि इतर विक्रेत्यांना ही टेस्ट ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्याने टेस्ट केलेली असेल, त्याच सुरक्षित व्यापाऱ्याकडून सामान खरेदी करावे, अशी औरंगाबादकरांना विनंती राहणार आहे.

अँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरऔरंगाबाद महापालिकेने अत्याधुनिक आणि अत्यंत स्वस्त अँटिजन टेस्टचा वापर सुरू केल्यानंतर आता राज्यातील इतर महापालिकांनी यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कीट उपलब्ध नाहीत. सोलापूर महापालिकेला औरंगाबाद दहा हजार कीट उसने देणार आहे. ३१ जुलैपर्यंत औरंगाबाद शहरात एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली असेल. व्यापाऱ्यांच्या २० हजार तपासण्यांमध्ये ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले. सार्वजिनक ठिकाणे सुरक्षित राहावीत हा त्यामागचा उद्देश आहे. ३०० सलून चालकांची तपासणी केली. त्यामध्ये ९ पॉझिटिव्ह आढळून आले.

आजचा निगेटिव्ह, उद्या पॉझिटिव्ह असू शकतोअँटिजन टेस्टबद्दल शहरामध्ये काही नागरिक भ्रम पसरवीत आहेत. आज एखाद्या नागरिकाची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी दुसऱ्या दिवशी उद्या त्याची टेस्ट पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकते. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद