शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

coronavirus : 'ट्रेस-टेस्ट-आयसोलेट'मध्ये औरंगाबाद महापालिका देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 17:33 IST

औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरशहरात पॉझिटिव्हची टक्केवारी २८ वरून ११ वर आली 

औरंगाबाद :  कोविड-१९ मध्ये गत चार महिन्यांत महापालिकेने प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला. टीटीआय (ट्रेस-टेस्ट-आयसोलेट) म्हणजेच रुग्ण शोधणे, त्याची तपासणी करणे आणि वेळीच उपचार करणे यामध्ये औरंगाबाद शहराने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. औरंगाबादेत ६६ हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत १ लाख तपासण्या पूर्ण होतील, असा विश्वास महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णवाढीची टक्केवारी २८ वरुन ११ टक्क्यांवर आली आहे.  टीटीआयमध्ये गोवा राज्य प्रथम आहे.

दहा लाख नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून तपासणीचे हे गणित अधिक तपशीलवार समजावून सांगताना पाण्डेय यांनी नमूद केले की, दिल्लीत दहा लाख नागरिकांमागे ४३ हजार, जम्मू- काश्मीरमध्ये ३८ हजार, आंध्र प्रदेशमध्ये २५ हजार, राजस्थान १६ हजार, महाराष्ट्र १४ हजार नागरिकांच्या तपासण्या होतात. औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण आता ३.७ टक्क्यांवर आले आहे. मागील महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के होते. आता हे प्रमाण ११ टक्क्यांवर आले आहे. 

कोरोनातील ७ प्रभावी कामेऔरंगाबाद महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये आता ३५ कर्मचारी काम करीत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, मॅपिंग, हाय रिस्क रुग्णांचा शोध घेण्याची पद्धत इतर कोणत्याच महापालिकेत नाही. २४ तास ७ दिवस सतत कंट्रोल रूम सुरू असून, याद्वारे अनेक कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात येत आहेत. मोबाईल फिव्हर क्लीनिक, १ लाख ४ हजार ८७९ ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवण्याचे काम येथूनच होते. अनेकदा डॉक्टरसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात. एमएचएमएच अ‍ॅप तयार करून द्या, अशी मागणी राज्यातील पाच महापालिकांनी केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांची स्वतंत्रपणे तपासणी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे. 

खर्च ३ हजारांवरून ५०० रुपयेलाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचा एका व्यक्तीचा खर्च तीन हजार रुपये आहे. अँटिबॉडीज टेस्ट या प्रकाराचा खर्चही ३ हजार रुपयांपर्यंत जात आहे. अँटिजन टेस्ट (आरटीपीसीआर) ५०० रुपयांमध्ये होत आहेत. भविष्यात व्यापारी आणि इतर विक्रेत्यांना ही टेस्ट ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्याने टेस्ट केलेली असेल, त्याच सुरक्षित व्यापाऱ्याकडून सामान खरेदी करावे, अशी औरंगाबादकरांना विनंती राहणार आहे.

अँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरऔरंगाबाद महापालिकेने अत्याधुनिक आणि अत्यंत स्वस्त अँटिजन टेस्टचा वापर सुरू केल्यानंतर आता राज्यातील इतर महापालिकांनी यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कीट उपलब्ध नाहीत. सोलापूर महापालिकेला औरंगाबाद दहा हजार कीट उसने देणार आहे. ३१ जुलैपर्यंत औरंगाबाद शहरात एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली असेल. व्यापाऱ्यांच्या २० हजार तपासण्यांमध्ये ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले. सार्वजिनक ठिकाणे सुरक्षित राहावीत हा त्यामागचा उद्देश आहे. ३०० सलून चालकांची तपासणी केली. त्यामध्ये ९ पॉझिटिव्ह आढळून आले.

आजचा निगेटिव्ह, उद्या पॉझिटिव्ह असू शकतोअँटिजन टेस्टबद्दल शहरामध्ये काही नागरिक भ्रम पसरवीत आहेत. आज एखाद्या नागरिकाची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी दुसऱ्या दिवशी उद्या त्याची टेस्ट पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकते. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद