शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:59 IST

 जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा इशारा

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पायीच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जातील, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज दिला.

पोलीस आयुक्त कार्यालयात कोरोना स्थितीविषयी  पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त  डॉ. नागनाथ कोडे उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत  मोठ्या संख्येने लोक बिनधास्तपणे वाहने घेऊन घराबाहेर पडतात. नागरिकांना त्यांच्या कॉलनीत किंवा घराजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असताना अनेकजण दुचाकी घेऊन खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडतात. यामुळे गर्दी होते आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. यामुळे दुचाकीच्या हँडलला पिशवी लटकावून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे वाहन जप्त केले जाणार आहे. प्रशासनाने सलग सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन केले. त्याचा परिणाम चांगला झाल्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव काही काळ राहणार असून आगामी काळातही नागरिकांनी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे हा नियम कायमस्वरुपी पाळावा लागेल, असे ते म्हणाले. 

वसाहतीतच जीवनावश्यक वस्तू खरेदी करा कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्या वसाहतीत अथवा परिसरातच  जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. सिडको अथवा गारखेड्याचा माणूस वाहन घेऊन गुलमंडीवर अथवा गुलमंडीच्या नागरिकाने कॅनॉट प्लेसमध्ये  खरेदीसाठी जाऊ नये. याकरिता लवकरच नियमावली आणली जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय नागरिकांनी  गर्दी करू नये. मास्क वापरावा आणि सहा फुटांपर्यंत शारीरिक अंतर राखावे, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस