शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

coronavirus : कोरोनाच्या सावटामुळे पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:57 IST

४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे.

औरंगाबाद -  कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४३नुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी केले. ४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे. यात्रेकडे येणाऱ्या जनसमुदायास प्रतिबंध करण्यात येणार असल्याने दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातून हात जोडून माघारी फिरावे लागणार आहे.

नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पैठण येथे येतात. कोरोना  आजाराची लागण होऊन जगभरात १०५,  देशात अंदाजे ३८१७  लोक दगावले आहेत, आतापर्यंत ११००२ पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  भारतात  ४३  जणांना याा आजाराची लागण झाल्याचे ( WHO ) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना 5 मार्च 2020 च्या मार्गदर्शिके मध्ये दिलेल्या आहेत. केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या करोना व्हायरस प्रतिबंध आराखडा दिनांक 03 मार्च 2020 नुसार जिल्हाधिकारी हे प्रतिबंधक मोहीमेचे नोडल अधिकारी आहेत . आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणन गर्दी , यात्रा , मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे सदर आराखडया मध्ये निर्देश दिले आहेत. पैठण , जिल्हा औरंगाबाद येथे श्री नाथ षष्ठी महोत्सव निमिताने आयोजित यात्रे मध्ये राज्यातील अनेक भागातून भाविक येतात आणि दिनांक 14  ते 16  मार्च 2020  दरम्यान अंदाजे 3 ते 5 लाख भाविक येतात. आणि कोरोना व्हायरसचा रुग्ण जर यात्रेमध्ये आला तर यामुळे कोरोना व्हायरस आजार ग्रस्तांच्या भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर आजारावर अदयापपर्यंत कुठलाही प्रतिबंधीत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. 

नाथषष्ठी महोत्सव यात्रेमध्ये व जमणाऱ्या जनसमुदाया मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून या ठिकाणी जात असलेल्या व्यक्तींना / भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्टया अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हयात कोरोना या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवित हानी होऊ नये या दृष्टीने सुरक्षीततेची उपाययोजना म्हणून  जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये पैठण , ता . पैठण , जि . औरंगाबाद येथील एकनाथ - षष्टी निमित आयोजित यात्रेस विशेष उपाययोजना करण्याचे दृष्टीने स्थगिती दिली आहे .

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या