शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन कोटी रूपये आरक्षित ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:38 IST

विभागीय आयुक्तांच्या बैठकीतील निर्णय

ठळक मुद्देकोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय  प्राधान्याने कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निधी ठेवण्याचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना २ कोटी रुपये आणीबाणी म्हणून आरक्षित ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी दिले. विभागातील सिव्हिल सर्जन, एनआरएचएमअंतर्गतही रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. प्राधान्याने कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निधी ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्तालयात बैठक घेण्यात आली.  या बैठकीला जिल्हाधिकारी, घाटी अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, पोलीस, मनपाचे अधिकारी होते. याबाबत ठाकूर म्हणाल्या, कोरोना व्हायरस काय आहे, सामान्यांपर्यंत माहिती देणे, जनजागृती करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे, तेथे माहिती देऊन आवाहन करण्यात येणार आहे. जेथे यात्रा, उरूस आहेत. त्यासाठी काय उपाययोजना असाव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.  नाथषष्ठी रद्द करण्याबाबत विचार असला तरी भावनिक मुद्यांवर थेट निर्णय होत नाही. पैठणचे विश्वस्त आजच्या बैठकीला उपस्थितीत राहू शकले नाहीत. राज्यभरात निर्णय होत आहेत, त्यानुसार जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. नाथषष्टी म्हणूनच नाही, तर पूर्ण प्रशासन म्हणून बैठक घेतली. मांगीरबाबाची यात्रा आहे, सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन पुढे जावे लागणार आहे. राज्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले असताना प्रशासनाने गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्याचे ठरविले आहे काय? या प्रश्नावर ठाकूर म्हणाल्या, अजून तसे केले नाही. रेल्वे, बसस्थानक, विमानतळ येथे दक्षता घेतली जात आहे. 

धार्मिक, सामाजिक कार्यक्रम टाळाप्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे म्हणाले, पैठण येथील यात्रेच्या निर्णयअनुषंगाने सीईओ, एसडीएम, तहसीलदार, बीडीओ व घाटी रुग्णालय पथकाला बोलावले होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रोहयोमंत्री संदीपान भुमरे हे आहेत. विश्वस्तांच्या कानावर सर्व बाबी टाकल्या आहेत. जिह्यातील सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम टाळावेत, असे नागरिकांना आवाहन केले आहे. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या