शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबळींचा आकडा ७६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:28 IST

रविवारी रात्री दोन आणि सोमवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : बायजीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष व एकनाथ नगर येथील ६६ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. तर बेगमपुरा येथील ६४ वर्षीय महिला आणि बारी कॉलनी येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाल्याने शहरात २४ तासात कोरोनाचे चार बळी गेल्याचे पुढे आले आहे. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आतापर्यंतचा आकडा ७६ वर गेला आहे. 

बेगमपुरा येथील ६४ वर्षीय वृद्ध महीलेला ११ मे पासून खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याना कोरोनाची लागण झाल्याचे १३ मे रोजी समोर आले. तेव्हापासून त्यांना कृत्रीम श्वास देण्यात आलेला होता. त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. तसेच कोरोनासह न्युमोनियामुळे सोमवारी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. 

तर ६३ वर्षीय बारी कॉलनी येथील व्यक्तीस ३० मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ३१ मे रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कोरोनामुळे त्याचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला, असे खाजगी रुग्णालयाकडून कळवण्यात आले. यामुळे चोवीस तासांत चार मृत्यू झाले असून आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ७६ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू