शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी; रात्री ११ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नोंदविणार गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:38 IST

रात्री ११ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नोंदविणार गुन्हे

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मंगळवारपासून ८ मार्चपर्यंत शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, औषधी दुकानदार, एसटी बस आणि एमआयडीसीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस गाड्यांना यातून वगळण्यात आले आहे. 

पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले की, शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, परंतु नागरिक विनामास्क शहरात फिरताना दिसत आहेत. महापालिकेकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर रोज दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र प्रत्येक नागरिकावर कारवाई करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त पांडेय आणि आमची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अधिसूचना काढण्यात येत आहे. 

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आधी समजावून सांगून पाहू. यानंतरही जे नागरिक  ऐकणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी दिला. 

‘लॉकडाऊन’मध्येही नागरिक सुसाट

अमरावती/अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ८ पासून अमरावती, अकोला महापालिका आणि अचलपूर, अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु, मंगळवारी जीवनावश्यक वस्तू, औषधी खरेदीच्या नावे नागरिकांनी बाजारात तोबा गर्दी केली होती. जणू कोरोना नाहीच, अशा आविर्भावात नागरिक वावरताना दिसून आले. दुपारी तीन वाजेनंतर गर्दी ओसरण्यास सुरुवात झाली. मास्कचा वापर वाढलेला दिसला, हे विशेष. अमरावतीत सकाळपासूनच चौकाचाैकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सकाळी ८ ते दुपारी ३ अनेक जण अकारण फेरफटका मारत होते. 

पारायण सप्ताहातून पसरला कोरोना 

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अवघ्या तीन हजार लोकवस्तीच्या ग्राम झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले. हे गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बघून निगेटिव्ह असलेल्यांनाच विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली आहे. २२ फेब्रुवारीला ५० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.२ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताह होता. आधी दोन महिला पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावात सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. २१३ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १४१ जण पॉझिटिव्ह निघाले होते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद