शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलैपर्यंत जनसंचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:04 IST

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यसायीक आणि  प्रशासकीय यंत्रणा यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देउद्योगांसह सर्व बंद असेलप्रशासनाचा जनभावना लक्षात घेऊन सर्वपक्षीय निर्णय घेतल्याचा दावा

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात १० ते १८ जुलैपर्यंत प्रशासनाने जनसंचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायीक आणि  प्रशासकीय यंत्रणा यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहराचे सर्वंकष निरीक्षण करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात सोमवारी बैठक झाली.  बैठकीनंतर संचारबंदीचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जाहीर केला.

कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे.  शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला देऊन सर्वकष निरीक्षण सुरु केले होते. आज विभागीय आयुक्तालयात झालेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीनंतर शुक्रवारी १० जुलै ते १८ जुलै पर्यंत  संचारबंदीवर शिक्का मोर्तब करण्यात आला. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, संचारबंदीचा निर्णय झाला आहे, या काळात सर्व काही बंद असणार आहे. उद्योग, व्यापार, भाजीपालाबंद असेल. थोड्याच वेळात मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त संयुक्त आदेश काढणार आहेत, त्यात संचारबंदीचा आराखडा असेल. 

उद्योगही बंद असणारवाळूजसह सात गावांमध्ये यापूर्वीच ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामध्ये उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. नव्या आदेशानुसार उद्योगही 18 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

शहरात 10 नवीन कंटेन्मेंट झोन

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने १० नवीन कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. याठिकाणी नागरिकांना बाहेर पडण्याची अजिबात मुभा नाही. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांसोबत महापालिकेचे कर्मचारीही गस्ती पथकात नेमण्यात आले आहेत. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये शंभर टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश वॉर्ड अधिकाऱ्यांना प्रशासनाने दिले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत २८ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. पूर्वीच्या १८ कंटेन्मेंट झोनचा अभ्यास करून ते हळूहळू वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्याने तयार झालेल्या १० कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्या भागामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत त्या वसाहती पत्रे लावून सील करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला संबंधित वॉर्ड कार्यालयामार्फत दोन शिफ्टमध्ये मनपाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

नव्याने तयार झालेले कंटेन्मेंट झोन  : कैलासनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, संभाजी कॉलनी, मयूरनगर-हडको, रामनगर, शिवाजीनगर, सिल्क मिल कॉलनी, शिवशंकर कॉलनी, परदेशी टॉवर शाहनूरवाडी. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस