शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लॉकडाऊनमध्ये लिकेज; रामनगर कोरोनाबाधित का झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:39 IST

संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता.

ठळक मुद्दे सलग ६ दिवस कडक लॉकडाऊन हवा

औरंगाबाद : रामनगर, मुकुंदवाडी भागात मागील २ दिवसांमध्ये तब्बल ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर एका ८० वर्षीय  व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामनगर कोरोनाबाधित का बनले,  असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रामनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता. आता रामनगरमध्ये सलग सहा दिवस लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर, म्हाडा कॉलनीत सर्वसामान्य गोरगरीब आणि विविध कंपन्यांतील कामगार मोठ्या संख्येने राहतात. मागील दोन महिन्यांमध्ये हा भाग कोरोनापासून दूर होता. या वसाहतीपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगरात ७० पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र, हा परिसर दर्शनी भागात पुरताच बंद करण्यात आला. पाठीमागील परिसर जशास तसा होता. संजयनगर भागातील अनेक नागरिक वेगवेगळ्या मार्गाने रामनगरमध्ये दाखल होत असत. या भागातील एका किराणा होलसेल दुकानावर  गर्दी होत होती. याकडे प्रशासन आणि नागरिकांनीही फारसे लक्ष दिले नाही. 

रामनगरमध्ये कोरोनाचा प्रवेशरामनगरातील एक ८० वर्षीय वृद्ध छोटीशी दुकान चालवत होते. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ व इतर चिप्स घेण्यासाठी तरुण गर्दी करीत असत. तरुणांनी गुटखा खाऊन परिसरात पिचकाऱ्या मारल्या होत्या. सदरील वयोवृद्ध नागरिकाला सर्वात अगोदर कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, आसपासच्या तब्बल ४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आज उघड झाले. यामुळे  भीतीचे वातावरण असल्याचे माजी महापौर बापू घडमोडे यांनी सांगितले. पालिकेने निर्जंतुकीकरण करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रत्येक गल्लीत लॉकडाऊन हवेरामनगर भागातील सर्वच वसाहतींमध्ये अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. या गल्लीतील नागरिक त्या गल्लीत सहजपणे ये-जा करू शकतात. ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्णपणे थांबवावी लागेल. परिसरात किमान सहा दिवस १०० टक्के लॉकडाऊन करायला हवे. मेडिकल दुकाने आणि दूध या दोन वस्तू वगळता इतर कोणत्याही सामानाचा पुरवठा न केल्यास कोरोना विषाणूंची साखळी ब्रेक करता येईल, असे घडमोडे यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद