शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

coronavirus : पैठणमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या वाढली; स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:58 IST

गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.

पैठण : तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या वाढल्याने या मजुरासाठी येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज दिली. 

गुरूवारी औरंगाबादरेल्वे स्थानकातून सायंकाळी   भोपाळला रवाना झालेल्या रेल्वेद्वारे पैठण तालुक्यातील ५८१ मजुरांना मध्यप्रदेश राज्यात पाठविण्यात येणार होते. परंतु, या रेल्वेत पैठणच्या मजुरांसाठी २०० आसन शिल्लक राहिले होते. त्यातच पैठण तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी प्रशासनाकडे १००० पेक्षा जास्त मजुरांनी नोंदणी केल्याने पैठण तालुक्यातील मजुरासाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्यात येणार असून १२०० मजुर या रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात परत जातील असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

पैठण तालुक्यात विटभट्टी व जिनिंग साठी मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशातील मजुर येतात. आज रोजी मध्यप्रदेशातील १५२४ पेक्षा जास्त मजुर पैठण शहरात आहेत. काही मजूर तालुक्यात आहेत. लॉकडाऊन परिस्थितीत या मजुरांची प्रशासनाने विविध कँप मध्ये व्यवस्था केलेली आहे. यापैकी १२०० मजुरांनी त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. 

पैठण तालुक्यातून बऱ्हानपूर ०६, खांडवा ९००, बडवणी २२, बालाघाट, ३४, मंडाला ०७, बीरसा ०५, संटाना ०२, भुनापूर ०२, बैतूल १९ खरगांव या जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त मजुरांनी परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केलेली आहे. पैठण तालुक्यातील मजुरांची एका रेल्वेची प्रवासी संख्या पूर्ण होत असल्याने स्वतंत्र रेल्वे द्वारे या मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.दरम्यान गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस