शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
2
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
3
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
4
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
5
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
6
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
7
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
8
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
9
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
10
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
11
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
12
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
13
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
15
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
16
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
17
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
19
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
20
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता

By सुमेध उघडे | Updated: May 9, 2020 13:59 IST

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

ठळक मुद्दे सम-विषम तारखेचा प्रयोग योग्य असल्याचे मत  विविध यंत्रणांमध्ये समन्वय असल्याचेही व्यक्त केले मत

- सुमेध उघडे  

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीला नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता हे कारण असल्याचे मत औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या आधी आढळलेल्या भागांसह शहरातील नवनव्या भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आॅनलाईन सर्वेक्षण केले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे कारण काय असावे, या पहिल्या प्रश्नावर तब्बल ५३.८ टक्के उत्तरदात्या नागरिकांनी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीमागे प्रशासनाची शिथिलता आणि नागरिकांची बेफिकिरी असे दोन्ही कारणीभूत असल्याचे मत नोंदविले आहे. तर ३८ टक्के नागरिकांना यामागे प्रशासनाची शिथिलता असून, केवळ  ८.२ टक्के उत्तरदात्यांना नागरिकांची बेफिकिरी यास कारणीभूत असल्याचे वाटते.

दुसऱ्या प्रश्नात, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी समन्वय आहे असे वाटते का, या प्रश्नावर  ४६.२ टक्के नागरिकांनी या सर्व यंत्रणेच्या कामावर समाधान व्यक्त करून समन्वय आहे असे म्हटले आहे. मात्र, ३९.८ टक्के उत्तरदात्यांना यांच्यात समन्वय नाही, असे वाटत असून १४ टक्के नागरिकांनी माहिती नाही असे मत नोंदविले. 

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन काळात सम- विषम तारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू-बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का, या प्रश्नावर ५७.३ टक्के नागरिकांनी निर्णय योग्य असल्याचा कौल दिला आहे. तर ३८.९ टक्के नागरिकांना हा निर्णय योग्य नसल्याचे वाटत असून, ३.८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले आहे. 

लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवा रेड झोनमध्ये आलेल्या औरंगाबादचा लॉकडाऊन कालावधी १७ मेनंतरही वाढवायला हवा का? या प्रश्नावर तब्बल ७४.७ टक्के नागरिकांनी सकारात्मकता दर्शवून होय म्हटले आहे, तर केवळ १३.१ टक्के नागरिकांनी लॉकडाऊन कालावधी वाढवू नये, असे वाटत असून १२.३ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार