शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता

By सुमेध उघडे | Updated: May 9, 2020 13:59 IST

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

ठळक मुद्दे सम-विषम तारखेचा प्रयोग योग्य असल्याचे मत  विविध यंत्रणांमध्ये समन्वय असल्याचेही व्यक्त केले मत

- सुमेध उघडे  

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीला नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता हे कारण असल्याचे मत औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या आधी आढळलेल्या भागांसह शहरातील नवनव्या भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आॅनलाईन सर्वेक्षण केले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे कारण काय असावे, या पहिल्या प्रश्नावर तब्बल ५३.८ टक्के उत्तरदात्या नागरिकांनी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीमागे प्रशासनाची शिथिलता आणि नागरिकांची बेफिकिरी असे दोन्ही कारणीभूत असल्याचे मत नोंदविले आहे. तर ३८ टक्के नागरिकांना यामागे प्रशासनाची शिथिलता असून, केवळ  ८.२ टक्के उत्तरदात्यांना नागरिकांची बेफिकिरी यास कारणीभूत असल्याचे वाटते.

दुसऱ्या प्रश्नात, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी समन्वय आहे असे वाटते का, या प्रश्नावर  ४६.२ टक्के नागरिकांनी या सर्व यंत्रणेच्या कामावर समाधान व्यक्त करून समन्वय आहे असे म्हटले आहे. मात्र, ३९.८ टक्के उत्तरदात्यांना यांच्यात समन्वय नाही, असे वाटत असून १४ टक्के नागरिकांनी माहिती नाही असे मत नोंदविले. 

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन काळात सम- विषम तारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू-बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का, या प्रश्नावर ५७.३ टक्के नागरिकांनी निर्णय योग्य असल्याचा कौल दिला आहे. तर ३८.९ टक्के नागरिकांना हा निर्णय योग्य नसल्याचे वाटत असून, ३.८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले आहे. 

लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवा रेड झोनमध्ये आलेल्या औरंगाबादचा लॉकडाऊन कालावधी १७ मेनंतरही वाढवायला हवा का? या प्रश्नावर तब्बल ७४.७ टक्के नागरिकांनी सकारात्मकता दर्शवून होय म्हटले आहे, तर केवळ १३.१ टक्के नागरिकांनी लॉकडाऊन कालावधी वाढवू नये, असे वाटत असून १२.३ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार