शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पाच महिन्यांपासून 'ब्रेक' लागलेले ‘कोरोन टास्क फोर्स’ पुन्हा मैदानात; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 17:25 IST

coronavirus in Aurangabad : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली.

ठळक मुद्देकोरोनाबाबत निष्काळजीपणा, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळल्यास दंडात्मक कारवाई

औरंगाबाद : रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाच महिन्यांपासून ‘ब्रेक’ लागलेल्या ‘कोरोना टास्क फोर्स’ची बैठक घेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्वांना कामाला लावले आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, भाजी मंडई, मॉल, आठवडी बाजार, बसस्टँड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी विशेष लक्ष द्या. सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करा. विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले. सर्व यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेऊन कोरोनाबाबत स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही त्यांनी सुचविले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मणीयार, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ.सुधाकर शेळके, आदींसह खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.

महापालिकेने काय करावे?महापालिकेने विना मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. कोविड केअर सेंटर, औषधांचा नियमित आढावा घ्यावा. बसस्टँड, रेल्वे स्टेशन येथे तपासणी केंद्र सुरूच ठेवावेत, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, कोविड लसीकरण मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हा परिषदेने काय करावे?जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष द्यावे, ग्रामीण रुग्णालये सुसज्ज ठेवावेत तसेच मास्क वापरणे बंधनकारक करावे.

जिल्हा प्रशासनाने हा प्रयत्न करावाउपविभागीय अधिकारी, तहसीलदार पोलिसांनी नियमित बैठका घेऊन समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियंत्रणाची नियमावली बंधनकारक करावी. जिल्हा प्रशासनाने नियमितपण टास्क फोर्सच्या बैठका घ्याव्यात.

एस. टी. महामंडळाला सूचना अशाएस.टी. बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा तसेच बसस्थानकाच्या परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करावी. लाऊडस्पीकरद्वारे वेळोवेळी सूचना कराव्यात.

आरटीओवरही जबाबदारीऑटो रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणाऱ्यांवर आरटीओंनी कारवाई करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे.

घाटी व आरोग्य विभागासाठी या सूचनाघाटीने बेड सज्ज ठेवावेत. औषधी, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खासगी रुग्णालयांनी कोविड व नॉन कोविड असे भाग करुन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड ठेवावेत तसेच ऑक्सिजन निर्मिती युनिट बसवावे. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांनी तत्काळ लस घ्यावी तसेच फ्रंटलाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनीही लस घ्यावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद