शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ३.२५ टक्क्यांवर; आरोग्य यंत्रणेचे मृत्यू रोखण्यावर लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:50 IST

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. महिनाभरात जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ वरून ३.२५ टक्के

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत राहणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्यावाढीच्या प्रश्नाऐवजी रुग्णांचे मृत्यू रोखण्याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जिल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.

जिल्ह्यात रोज रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येपेक्षा यातील गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत आणि मृत्यू रोखले जातील, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. ११ जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ टक्के होता. महिनाभरात मृत्यूदर ३.२५ टक्के झाला.घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत मंगळवारी दुपारपर्यंत १४१ गंभीर रुग्ण दाखल होते. रुग्णांसाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु उशिरा दाखल होण्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि  मृत्यू ओढवतो. त्यामुळे वेळीच रुग्णालयात दाखल होणे महत्त्वाचे असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. 

महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू ११ जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ८,२१६ होती, तर एकूण मृत्यूचा आकडा हा ३५० होता. महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर रुग्णसंख्या दुप्पट झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी (दि.११) दुपारपर्यंत १७,१२५ झाली, तर एकूण मृतांची संख्या ५५८ झाली.

५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्षकोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहील; परंतु त्यापेक्षाही रुग्ण गंभीर होऊन मृत्यू ओढवणार नाही यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी ५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.- डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद