शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Aurangabad : काॅन्टॅक्ट ट्रेसिंग घसरली; चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:36 IST

CoronaVirus In Aurangabad : जिल्ह्यात बाधितांचा आकडा घसरला असला तरी पाॅझिटिव्हिटी दर वाढलेलाच आहे

ठळक मुद्देजिल्ह्याची रुग्णवाढ चार अंकांवरून तीन अंकावरआठवडाभर उंचावलेली चाचणी संख्या आता पुन्हा घटत आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात महापालिका क्षेत्राचा ३० टक्क्यांपेक्षा अधिक तर ग्रामीण भागात २६ टक्क्यांवर गेलेला पाॅझिटिव्हिटी रेट सध्या कमी झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील हा दर १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. बाधित रुग्णसंख्या घटताना दिसतेय. मात्र, चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे.

चाचण्या वाढवून पाॅझिटिव्ह रुग्ण अधिक प्रमाणात शोधणे, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक करण्यावर भर असल्याची स्ट्रॅटेजी जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आली होती. मात्र, आठवडाभर उंचावलेली चाचणी संख्या आता पुन्हा घटत आहे, तर शहरातील चाचण्याही पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे दररोजच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अद्याप १६ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. तो फारसा दिलासादायक नसला तरी आणखी तपासणी वाढविण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत असताना ग्रामीण भागात चाचणीला अनुत्सुकता दिसून येत आहे.

अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अधिक अहवाल पॉझिटिव्हअँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह येत असल्याचे पहायला मिळत आहे. १५ एप्रिलला आरटीपीसीआर पाॅझिटिव्हिटीचे १६.६५, तर अँटिजेन पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण ९.८७ टक्के होते. १ मे रोजी आरटीपीसीआरमध्ये २५.४७ बाधित, तर अँटिजेन केल्यानंतर ८.३३ टक्के बाधित आढळले.

ग्रामीण भागात टेस्टिंग कमीचप्रत्येक आरोग्य केंद्रावर किमान १०० तपासणी व्हावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले. कमी तपासणी असलेल्या १३ केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून खडसावले. मात्र, ग्रामीण भागातून तपासणीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळू न शकल्याने ५० आरोग्य केंद्र आणि ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून पाच हजारांपेक्षा अधिक तपासण्या एकदाही होऊ शकल्या नसल्याने आकडेवारीवरून समोर आले आहे. ग्रामीण भागात दररोज साडेतीन ते साडेचार हजार चाचण्या होत आहेत. ४५५५च्या वर ग्रामीण भागात चाचण्या झाल्या नाहीत. यात साडेचारशे ते साडेनऊशेपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

तारीख - एकूण चाचण्या -रुग्ण -पॉझिटिव्हिटी दर१ एप्रिल - ६९९५ -१४८१            -२१.१७८ एप्रिल - ८७६४ -१३६२            -१५.५४१५ एप्रिल -९६०३ -१३२९ -१३.२४२१ एप्रिल -९३८५ -१२०७ -१२.८६२८ एप्रिल -७७३५ १३१४             १६.९९१ मे             -६९५० -११३४             -१६.३२२ मे             -६११५             -८३५            -१३.६५३ मे             - ७८३२             -८०१             -१०.२२४ मे             - ७४२०            -९८१             -१३.२२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद