शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

CoronaVirus : तत्कालीन गृहमंत्र्यांची घोषणा हवेतच; लॉकडाऊन उल्लंघनाचे गतवर्षी दाखल २ हजार १४९ गुन्हे रद्द झालेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:23 IST

CoronaVirus: लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केल्या गेले.

ठळक मुद्देतत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी केली होती घोषणा

औरंगाबाद: गतवर्षी कोविड कालावधीत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २ हजार १४९ नागरिकांवर पोलिसांनी नोंदविलेले कलम १८८ चे सर्व गुन्हे परत घेण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या घोषणेनंतर कोणतेही आदेश गृहमंत्रालयांकडून पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. परिणामी हे गुन्हे परत घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षी कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २० मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केल्या गेले. २० मार्च ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २ हजार १४९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. कोरोना साथ आणि लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि रोजगार बुडाल्यामुळे नागरिकांचे उत्पन्न घटले होते. मानसिक आणि आर्थिक दृष्टीने कमकुवत झालेल्या नागरिकांवर कोविड कालावधीत नोंदविलेली कलम १८८ चे गुन्हे परत घेण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. या घोषणेचा लाभ औरंगाबाद शहरातील २ हजार १४९ नागरिकांना होणार होता. शिवाय, पोलिसांचाही न्यायालयांत चकरा मारण्याचा ताण कमी होणार होता. या घोषणेनंतर गृहमंत्रालयाने हे गुन्हे परत घेण्यासंदर्भात कोणतेही लेखी आदेश राज्यातील पोलीस प्रशासनाला पाठविले नाहीत. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे कोविड कालावधीतील १८८ चे गुन्हे परत घेण्याचा निर्णय निर्णय मागे पडला.

लेखी निर्देश प्राप्त झाले नाहीतगतवर्षी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी नोंदविलेले कलम १८८ चे गुन्हे परत घेण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झाले नाहीत. परिणामी हे गुन्हे परत घेतले जाणार नाहीत.- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी