शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

corona virus : औरंगाबादमधील ‘ऑटो’ उद्योगाला ‘कोरोना’ची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST

येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल.

ठळक मुद्दे२० टक्के उत्पादन घसरण्याचा धोकाचीनमधील कच्चामाल पुरवठा करणारी साखळी सध्या ठप्प उलाढालीवरही परिणाम शक्य 

- विकास राऊत

औरंगाबाद : चीनमध्ये उद्भवलेल्या ‘कोरोना’च्या साथीचा फटका औरंगाबादेतील स्वयंचलित वाहन (ऑटो) उद्योगांना बसला आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादनात २० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. स्वयंचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारे औरंगाबाद देशामधील प्रमुख केंद्र आहे. 

चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर येथील उद्योग आणि उत्पादन अवलंबून असल्याने चीनमध्ये कोरोना साथीमुळे उद्योगांची झालेली पडझड कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारी ठरली. चीनमधून जहाज वाहतुकीद्वारे होणारा पुरवठा खंडित झाला असून, अशा पुरवठ्यांवर निर्बंध आल्यामुळे औरंगाबादेतील उत्पादनात घट झाली. परिणामी, उत्पादनाचे लक्ष्य गाठणे कठीण होण्याची शक्यता आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वस्टेशन, पैठण या प्रमुख औद्योगिक वसाहती औरंगाबादमध्ये आहेत.

सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले, चीनमधील कच्चामाल पुरवठा करणारी साखळी सध्या ठप्प पडलेली आहे. बी-६ वाहनांचे उत्पादन आता उंबरठ्यावर आहे. व्हेंडरमध्ये एमएसएमई सेक्टरमधील जे उद्योग आहेत, ते ज्यांचे पुरवठादार आहेत, त्या बड्या उद्योगांकडील स्टॉक सध्या असेल, तर काही जास्त परिणाम नाही होणार; परंतु बड्या उद्योगांकडील स्टॉक संपत आला, तर त्यांचे उत्पादन कमी होईल. त्याचा फटका एमएसएमईला बसू शकेल. येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, उद्योग वर्तुळात सध्या चिंतेचे वातावरण आहे. सप्लाय चेनवर परिणाम होत आहे. कृषी उद्योगांना लागणारे रसायन चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. सप्लाय चेन बंद असल्याने त्या उद्योगांनादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. 

१० ते २० टक्के उद्योगांवर परिणाम कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, १० ते २० टक्के उद्योग विश्वांवर परिणाम होईल. आॅटोमोबाईल आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनअम कच्चा मॉल, आॅटोमोटिव्हसाठी लागणारे पार्टस् ज्यामध्ये लघु व मध्यम दर्जातील पार्टस् ज्यांचा जास्त उत्पादनासाठी वापर होतो. या उत्पादनांची चीनमध्ये मोठी उत्पादन साखळी आहे. ते औरंगाबादमधील मुख्य स्रोत आहेत. लघु व मध्यम उद्योगांना फटका बसणे शक्य आहे. कच्चामाल घेण्यासाठी आम्ही चीनवर अवलंबून नाही; परंतु माझे जे ग्राहक आहेत, त्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. त्यामुळे त्यांचे उत्पादन कमी झाल्याने माझे उत्पादन कमी झाले आहे. दोन आव्हाने आहेत; पण त्यातून फायदा पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे पार्टस् आयात होतात. ते भारतातही उत्पादित होतात; परंतु संख्या आणि किमतीवर आपण ते उत्पादित करीत नाहीत. स्थानिक पातळीवरील उत्पादकांना आता संधी आहे. दोन ते पाच आठवड्यांसह दोन महिन्यांपर्यंत वेळ देऊन आपण सक्षम होऊ शकतो. दोन ते पाच टक्के पार्टस् सोडले, तर भारतात उत्पादन साखळी आहे. सद्य:स्थितीत साधारणत: १० ते २० टक्के परिणाम झाला आहे. 

औरंगाबादचे उद्योगविश्व असे : - 5 वसाहती; 4,000 उद्योग- चीनकडून येणारा कच्चा माल 27 %; 2,000 एमएसएमई उद्योग- 3 लाख रोजगार; 15 दिवसांनंतरच चित्र होणार स्पष्ट

टॅग्स :AutomobileवाहनAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या