शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

corona virus : रुग्णाच्या निवासाच्या ३ कि. मी. परिघात युद्धपातळीवर सर्वेक्षण; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:17 IST

४८ तासांत संशयित रुग्ण ओळखून संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

ठळक मुद्दे मनपाच्या १८ कर्मचाऱ्यांची ९ पथके;आरोग्य पथकाची घरोघरी भेट शहरात परतल्यानंतर घेतला वर्गपती, मुलांची, शेजारच्यांची तपासणी

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह म्हणून निदान होताच रविवारी दुपारनंतर सदर रुग्णाच्या निवासस्थानाच्या ३ कि.मी.च्या परिसरात महापालिकेने युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्रारंभी रुग्णाच्या अगदी जवळ संपर्कात आलेल्या व्यक्तींचे (हायरिस्क क्लोज कॉन्टॅक्ट) सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक घरी जाऊन लोकांच्या प्रकृतीची विचारणा केली जाणार आहे. एखादा संशयित आढळल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

महापालिकेने सर्वेक्षणासाठी ९ पथके तयार केली आहेत. एका पथकात दोघांचा समावेश आहे. यामध्ये परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी दुपारनंतर हे सर्वेक्षण तात्काळ सुरू करण्यात आले. यामध्ये प्रारंभी या महिलेच्या घराशेजारील आणि अगदी जवळून संपर्क झालेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यामध्ये घरातील प्रत्येक सदस्याला काही त्रास आहे का, संबंधित रुग्णाच्या संपर्कात कोणी आले होते का, जर संपर्क झाला असेल, तर त्यानंतर ते कोठे गेले होते, याची माहिती गोळा करण्यात येत आहे. आगामी ४८ तासांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये. खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.

टूर्स, ट्रॅव्हल्समधील लोक शोधणारसदर महिला टूर्स, ट्रॅव्हल्सद्वारे रशिया, कझाकिस्तानच्या प्रवासाला गेल्या होत्या. त्यातील प्रत्येक लोकांचा शोध घेतला जाणार आहे. संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

शहरात परतल्यानंतर घेतला वर्गशहरात परतल्यानंतर प्राध्यापक महिलेने त्यांच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतल्याचीही माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे. प्राध्यापिकेला कोरोना झाल्याची माहिती संस्थेतील काही अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत गेली. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले. परंतु कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले.

६ तास दिल्ली विमानतळावर, फक्त ताप तपासलापरदेशातून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर सदर रुग्णाचा थर्मल स्कॅनिंगद्वारे केवळ ताप तपासण्यात आला. तेव्हा काहीही आढळून आले नाही. त्यानंतर सदर रुग्ण दिल्ली विमानतळावर ६ तास होत्या. त्यानंतर दिल्ली-औरंगाबाद प्रवासही विमानाने केला. त्यामुळे अन्य विमान प्रवाशांचा शोध घेऊन तपासणी करण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तविली.ज्या दिवशी रशियात पहिला रुग्ण आढळला त्याच दिवशी त्या औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात दाखल झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पती, मुलांची, शेजारच्यांची तपासणीमहापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा पती, मुलांमध्ये काही लक्षणे आहेत का, याची तपासणी केली. तेव्हा त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. महिलेच्या जवळच्या अन्य नातेवाईकांसह संपर्कात आलेल्या इतरांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रवासात त्यांच्या घराशेजारील २ जण होते. त्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  संपर्कात आलेल्या नातेवाईकांना १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुलगा डॉक्टर: ‘कोरोना’ मुक्त करण्यासाठी योगदानसदर महिलेचा एक मुलगा डॉक्टर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून योगदान दिले जात असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांना वसतिगृहात थांबवले 

दरम्यान, प्राध्यापिका ज्या संस्थेत शिकवत होत्या येथील सर्वाची तपासणी करण्यात येत आहे. संस्थेत प्रवेश करणाऱ्यास रुमाल लावण्याची सूचना दिली जात आहे. विद्यार्थ्यांना गावी जाण्याचे थांबविण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे तिकीतही रद्द करण्यात आले आहेत. वस्तीगृहातच १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्र