शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : लस हाच उपाय; लस घेतलेल्या एकाचाही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 15:35 IST

vaccine is the remedy for corona virus : आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला

ठळक मुद्देपहिल्या डोसनंतर ५० तर दुसऱ्या डोसनंतर केवळ १६ बाधितपहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के पॉझिटिव्हदोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०४ टक्के पॉझिटिव्ह

- योगेश पायघनऔरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागात लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे, तर शहरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. जिल्ह्यात पहिली लस घेतल्यावर आतापर्यंत ५० जणांना बाधा झाली, तर दुसरी लस घेतल्यावर १६ जण बाधित झाले. मात्र, लस घेतलेल्यांपैकी एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत ३ लाख ७१ हजार १०८ जणांना दिली लस घेतली. त्यात पहिला डोस ३ लाख ३१ हजार १८९ जणांनी घेतला, तर दुसरा डोस ३९ हजार ९१९ जणांनी घेतला. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ३०.८४ टक्के शहरात तर १८.४९ टक्के पहिला डोस, तर दुसरा डोस शहरात ५.२४ तर ग्रामीणमध्ये १.३४ टक्के लोकांनी घेतला आहे. एप्रिलअखेर उद्दिष्टपूर्तीची तयारी आरोग्य विभागाची होती. मात्र, लसींच्या तुटवड्याने लसीकरण मोहिमेची गती कमी झाली आहे. लसीकरणानंतरही मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ धुण्याची त्रिसूत्री पाळण्याची गरज आहे. लसीकरण केल्यावरही आतापर्यंत ६६ जणांना कोरोनाची बाधा झाली, यात प्रामुख्याने डाॅक्टर, हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्सची संख्या असून, लस घेतल्यानंतर गंभीर होण्याचे प्रमाण फारच कमी दिसून आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के पॉझिटिव्हजिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर, आतापर्यंत पहिल्या डोसनंतर शहरात २२ तर ग्रामीण भागात २८ जणांना कोरोनाची बाधा झाली. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या ०.०१ टक्के आहे.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०४ टक्के पॉझिटिव्हआतापर्यंत ३९ हजार ९१९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यात शहरातील १२ तर ग्रामीणमधील ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हे प्रमाण ०.०४ टक्के आहे.

लसीनंतर रुग्ण गंभीर होत नाहीपहिला व दुसरा लसीचा डोस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद वाॅररूमकडून प्राप्त माहितीत नाही. लस सुरक्षित आहे. लसीमुळे नंतर बाधा झाली, तरी गंभीर होणारे रुग्ण दिसून आलेले नाही, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात लस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद नाही. लस महत्त्वाचीच असून, लसीकरण करून त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी विजयकुमार वाघ म्हणाले.

लस घेतल्यास धोका कमीशासकीय संस्थांमध्ये सर्वाधिक कोविड बेडची सुविधा देणारी संस्था म्हणून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था घाटी आहे. येथे गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांत एकाही रुग्णाने लस घेतलेली दिसून आलेले नाही. त्यामुळे लस घेतल्याने कोरोनाचा धोका कमी होतो, असे सर्वसाधारण निरीक्षण आहे. मलाही दोन्ही लस घेतल्यावर बाधा झाली. वय, इतर आजार असतानाही मी कोरोनाबाधित काळात गंभीर झाले नाही. त्यामुळे धोका कमी होऊन बरी झाले.- डाॅ.कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद

एकूण रुग्ण - १,१४,४९५कोरोनामुक्त - ९७,१९८कोरोनाने मृत्यू - २,२७५आतापर्यंत एकूण लसीकरण - ३,७१,१०८केवळ पहिला डोस घेतला - ३,३१,१८९दोन्ही डोस घेतले - ३९,९१९

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद