शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नवे आव्हान ! कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने दिलासा; मात्र गंभीर रुग्णांच्या वाढीने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:55 IST

corona virus in Aurangabad : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरजआयसीयू बेड रुग्णांनी भरलेएकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे; पण सध्या कोरोनाने गंभीर रूप घेतल्याची परिस्थिती आहे. कारण दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही, तर आयसीयू बेडही रुग्णांनी भरले आहेत. व्हेंटिलेटर रिकामे होण्याची वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांवर ओढवत आहे.

जिल्ह्यात एक लाखावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांच्या घरात आली आहे; पण आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. आरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असते; परंतु जिल्ह्यातील गंभीर रुग्णांच्या संख्येपुढे व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत आहे. कारण एका व्हेंटिलेटरवर एक रुग्ण किमान १० ते १५ दिवस असतो. त्यात रोज गंभीर रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरशिवाय रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान डाॅक्टरांपुढे उभे राहत आहे. आयसीयू बेडही रुग्णांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे सौम्य स्वरूपातील, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांचे आयसोलेशन बेड ५० टक्क्यांवर रिक्त आहेत. त्यामुळे आता गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा वाढविण्याची गरज आहे.

घाटीत ४९४ गंभीर रुग्णघाटी रुग्णालयात सध्या तब्बल ४९४ रुग्ण गंभीर आहेत. याठिकाणी आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत; परंतु खाजगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नातेवाईक सर्वत्र भटकंती करून शेवटी घाटीत येत असल्याची स्थिती आहे.

२ टक्के रुग्णांनाच गरज१० मेपासून कोरोनाची संख्या कमी होईल, अशी परिस्थिती आहे. शंभर रुग्णांत २ टक्के रुग्ण असे असतात, त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज असते. तब्बल ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत.- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

बहुतांश रुग्णांना हवा ऑक्सिजनसध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे; पण जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील बहुतांश जणांना ऑक्सिजन लागत असल्याची स्थिती आहे. पहिल्या लाटेत खाटा वाढविण्यात आल्या, तर ऑक्सिजनची सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील स्थिती : आयसीयू बेड-६३७रिक्त आयसीयू बेड-८८व्हेंटिलेटर-३०५रिक्त व्हेंटिलेटर- ०आयसोलेशन बेड-४,७२४रिक्त आयसोलेशन बेड-२,५६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद