शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नवे आव्हान ! कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने दिलासा; मात्र गंभीर रुग्णांच्या वाढीने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:55 IST

corona virus in Aurangabad : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरजआयसीयू बेड रुग्णांनी भरलेएकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे; पण सध्या कोरोनाने गंभीर रूप घेतल्याची परिस्थिती आहे. कारण दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही, तर आयसीयू बेडही रुग्णांनी भरले आहेत. व्हेंटिलेटर रिकामे होण्याची वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांवर ओढवत आहे.

जिल्ह्यात एक लाखावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांच्या घरात आली आहे; पण आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. आरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असते; परंतु जिल्ह्यातील गंभीर रुग्णांच्या संख्येपुढे व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत आहे. कारण एका व्हेंटिलेटरवर एक रुग्ण किमान १० ते १५ दिवस असतो. त्यात रोज गंभीर रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरशिवाय रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान डाॅक्टरांपुढे उभे राहत आहे. आयसीयू बेडही रुग्णांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे सौम्य स्वरूपातील, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांचे आयसोलेशन बेड ५० टक्क्यांवर रिक्त आहेत. त्यामुळे आता गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा वाढविण्याची गरज आहे.

घाटीत ४९४ गंभीर रुग्णघाटी रुग्णालयात सध्या तब्बल ४९४ रुग्ण गंभीर आहेत. याठिकाणी आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत; परंतु खाजगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नातेवाईक सर्वत्र भटकंती करून शेवटी घाटीत येत असल्याची स्थिती आहे.

२ टक्के रुग्णांनाच गरज१० मेपासून कोरोनाची संख्या कमी होईल, अशी परिस्थिती आहे. शंभर रुग्णांत २ टक्के रुग्ण असे असतात, त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज असते. तब्बल ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत.- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

बहुतांश रुग्णांना हवा ऑक्सिजनसध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे; पण जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील बहुतांश जणांना ऑक्सिजन लागत असल्याची स्थिती आहे. पहिल्या लाटेत खाटा वाढविण्यात आल्या, तर ऑक्सिजनची सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील स्थिती : आयसीयू बेड-६३७रिक्त आयसीयू बेड-८८व्हेंटिलेटर-३०५रिक्त व्हेंटिलेटर- ०आयसोलेशन बेड-४,७२४रिक्त आयसोलेशन बेड-२,५६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद