शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
3
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
4
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
5
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
6
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
7
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
8
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
9
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
10
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
11
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
12
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
13
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
14
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
15
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
16
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
17
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
18
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
19
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
20
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : उच्चरक्तदाब आणि मधुमेह कोरानाग्रस्ताला नेतात मृत्यूच्या दारात; इतर आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:30 IST

corona virus : उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते.

ठळक मुद्दे५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात रोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूला फक्त कोरोनाच कारणीभूत नाही, तर कोरोनासह इतर आजारांमुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होते आणि मृत्यू ओढावत आहे. कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात उच्चरक्तदाब पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मधुमेह आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रित ठेवण्यासह कोरोनाची लक्षणे दिसल्यावर वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

वयाच्या ५० नंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटांतील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाबाधितांत मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. बळींची संख्या आजघडीला २ हजार ४०१ वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मृतांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनी विकार आणि अन्य या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार नियंत्रित ठेवले पाहिजे. त्याची औषधी वेळेवर आणि नियमित घेतली पाहिजे. विनाकारण चिंता करू नये. सकारात्मक राहिले पाहिजे. आजार, लक्षणे अंगावर काढू नये. वेळीच उपचार घेतले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते. कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.- डाॅ. अनिल जाेशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी

१५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान एकूण मृत्यू-१,४४१कोरोनामुळे मृत्यू-४५०इतर कारणांनी मृत्यू-९९१ 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू