शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : नियतीची क्रुरचेष्टा ! एकाचे अंत्यसंस्कार करायचे आणि दुसऱ्यासमोर खोटे हसायचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 12:48 IST

Corona Virus : आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे.

ठळक मुद्देआई वडिलांपैकी एकाचे निधन आणि दुसऱ्याला माहितीच नाहीकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अशा अतिभयंकर प्रसंगातून जावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाने इतकी भयंकर वेळ आणली आहे की, आई - वडिलांपैकी एकाचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार करायचे आणि जो जिवंत आहे, त्याच्यापासून हे एवढे मोठे दु:ख लपवून ठेवायचे. वेळप्रसंगी त्याच्यासमोर खोटे हसायचे, तुमच्या दोघांच्याही प्रकृती सुधारत आहेत, तुम्ही लवकरच एकमेकांना भेटाल, असे मनावर दगड ठेवून सांगायचे आणि वेळ मारून न्यायची. नियतीने केलेली ही अशी क्रूरचेष्टा आज कोरोनामुळे अनेकांच्या वाट्याला येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अशा अतिभयंकर प्रसंगातून जावे लागत आहे. वृद्ध आई - वडिलांना कोरोना झाला की, दोघांनाही दवाखान्यात ठेवावे लागते. यापैकी अनेक जण मधुमेह, रक्तदाब किंवा वार्धक्यामुळे होणाऱ्या इतर आजारांनी कृश झालेले असतात. ते कोरोनाच्या तावडीत चटकन सापडतात. योग्य आणि वेळेत उपचार मिळाले तरी कोरोनावर मात करण्यात अपयशी ठरतात आणि मृत्यू ओढवतो. पण त्याच वेळी त्यांचा जोडीदार मात्र त्यांच्यासारख्याच परिस्थितीतून जात असतो. कोरोनामुळे प्रकृती अधिकच नाजूक झालेली असते. पण ती लवकरच सुधारेल, अशी आशा डॉक्टरांनाही असते. अशा नाजूक स्थितीत आपल्या जोडीदाराचे असे अनंताच्या प्रवासाला निघून जाणे त्यांना अजिबातच झेपणारे नसते. त्यामुळे जोडीदाराच्या निधनाबाबत आताच काहीही कळू देऊ नका, कारण हा आघात पचविण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देणार नाही, असे डॉक्टरांनीच सूचविलेले असते. त्यामुळे ज्यांना जायचे होते, ते तर निघून गेले.

आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे. आईला गमावले आहे आणि वडील सुधारत आहेत, किंवा वडील गमावले आईची तब्येत सुधारते आहे, अशी परिस्थिती आज अनेक मुलांसमोर ओढवली आहे. जाणारा गुपचूप निघून जातो. पण, जो राहतो त्याच्या प्रश्नांना सामोरे जाणे, अतिकठीण होते. गेल्याचे दु:ख करावे की, दुसऱ्याची प्रकृती सुधारतेय म्हणून समाधान मानावे, हेच अशावेळी कळत नाही, अशी आपबिती काहींनी सांगितली.

आता बाबांना कुठून आणू ?कोरोनामुळे आई - वडील दोघेही वेगवेगळ्या दवाखान्यात होते. दोघांकडेही मोबाईल असल्याने त्यांचे एकमेकांशी तसेच आमच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे व्हायचे. काही दिवसांनी वडील आयसीयूमध्ये दाखल झाल्याने त्यांना फोनवर बोलणे अशक्य झाले. काही दिवसांतच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आईची तब्येत सुधारत असली तरीही नाजूकच होती. त्यामुळे तिच्यापासून हे सगळे लपवून ठेवावे लागले. बाबा कसे आहेत, औषधे घेत आहेत ना, मला बोलायचेय त्यांच्याशी, बघायचेय त्यांना. एकदा तरी व्हिडिओ कॉल करून द्या ना, असे आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची आणि आमचे हृदय पिळवटून निघायचे. आता कसा आणि कुठे व्हिडिओ कॉल करू आणि बाबांना कुठून आणू... असा केविलवाणा प्रश्न विचारत एका जणाने आपल्या भावनांना वाट करून दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू