शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

CoronaVirus : औरंगाबादला १४ तारखेपर्यंत धोका; रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 09:24 IST

१० दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा खबरदारीचा इशारा

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती आहे. आगामी १४ मे पर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. शहरातील रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले. 

यापूर्वी आरोग्य यंत्रणेने २९ एप्रिल रोजी रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. शहरात १९ एप्रिलपासून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होत आहे. त्यात गेल्या १६ दिवसांत एकही दिवस खंड पडलेला नाही. शहरात २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यात गेल्या ८ दिवसांत दररोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. आता ५ ते १४ मे दरम्यान रुग्णसंख्या आणखी झपाटयाने वाढण्याची भीती आहे. 

या कालावधीत शहरातील रुग्णसंख्या १३०० च्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शहरासाठी चिंतदायक ठरण्याची भीती आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांत वाढ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मात्र, आद्यपही समूह संसर्ग नाहीच, असा दावा केला जात आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.

आणखी एक हजार रुग्ण ? शहरात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या पुढे आहे. त्यामुळे आणखी १ हजार रुग्ण वाढण्याची भीती आहे. या कालावधीत नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशी आहे उपचाराची परिस्थिती शहरात २ हजार रुग्णांवर उपचाराची तयारी मनपाने केलेली आहे. तर घाटीत ४५० रुग्णांच्या उपचाराची सुविधा होऊ शकते, असे मनपाचे म्हणणे आहे. परंतु सध्या २०८ रुग्णांवर उपचाराची यंत्रणा घाटीत सज्ज आहे. यातही केवळ ४८ गंभीर रुग्णांवर उपचार शक्य आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटा आहे. प्रत्यक्षात सध्या १३० रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. येथील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

'डब्लूएचओ'चा इशाराजागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)१४ मे पर्यंत रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. त्यानुसार शहरात १३०० पर्यंत रुग्णसंख्या जाऊ शकते. उपचाराच्या दृष्टीने मनपा, घाटी आणि आमच्याकडून नियोजन करण्यात आलेले आहे. - डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद