शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus : औरंगाबादला १४ तारखेपर्यंत धोका; रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 09:24 IST

१० दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा खबरदारीचा इशारा

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती आहे. आगामी १४ मे पर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. शहरातील रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले. 

यापूर्वी आरोग्य यंत्रणेने २९ एप्रिल रोजी रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. शहरात १९ एप्रिलपासून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होत आहे. त्यात गेल्या १६ दिवसांत एकही दिवस खंड पडलेला नाही. शहरात २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यात गेल्या ८ दिवसांत दररोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. आता ५ ते १४ मे दरम्यान रुग्णसंख्या आणखी झपाटयाने वाढण्याची भीती आहे. 

या कालावधीत शहरातील रुग्णसंख्या १३०० च्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शहरासाठी चिंतदायक ठरण्याची भीती आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांत वाढ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मात्र, आद्यपही समूह संसर्ग नाहीच, असा दावा केला जात आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.

आणखी एक हजार रुग्ण ? शहरात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या पुढे आहे. त्यामुळे आणखी १ हजार रुग्ण वाढण्याची भीती आहे. या कालावधीत नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशी आहे उपचाराची परिस्थिती शहरात २ हजार रुग्णांवर उपचाराची तयारी मनपाने केलेली आहे. तर घाटीत ४५० रुग्णांच्या उपचाराची सुविधा होऊ शकते, असे मनपाचे म्हणणे आहे. परंतु सध्या २०८ रुग्णांवर उपचाराची यंत्रणा घाटीत सज्ज आहे. यातही केवळ ४८ गंभीर रुग्णांवर उपचार शक्य आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटा आहे. प्रत्यक्षात सध्या १३० रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. येथील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

'डब्लूएचओ'चा इशाराजागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)१४ मे पर्यंत रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. त्यानुसार शहरात १३०० पर्यंत रुग्णसंख्या जाऊ शकते. उपचाराच्या दृष्टीने मनपा, घाटी आणि आमच्याकडून नियोजन करण्यात आलेले आहे. - डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद