शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

corona virus : औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:27 IST

आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून, शहरात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात  आल्या .

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयात उपचार सुरूप्रकृती स्थिर, ४ दिवसांनंतर पुन्हा पाठविणार तपासणीसाठी ‘स्वॅब’

औरंगाबाद : राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादेतही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या ५९ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून, शहरात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात  आल्या .

खाजगी रुग्णालयात दाखल  ही महिला शहरातील एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहे. शहरातून दि.२३ फेब्रुवारी रोजी त्या रशिया, कझाकिस्तान येथे गेल्या. तेथून त्या दि.३ मार्चला शहरात परतल्या. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्या दि.१३ मार्च रोजी खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची लक्षणे आणि प्रवासाच्या माहितीवरून कोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाने नोंद घेऊन त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, साथरोग अधिकारी डॉ. एस. एन. बारटकर, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी रुग्णालयात धाव घेतली व रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतला. महिलेची प्रकृती स्थिर असून, ती संवादही साधते. श्वासोच्छ्वास घेण्यास त्यांना कोणताही त्रास होत नाही. खाजगी रुग्णालयातच पुढील उपचार सुरू राहणार असल्याचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

‘एआरटी’ उपचार सुरू या महिलेवर १० खाटांच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. हा वॉर्ड रुग्णालयातील इतर वॉर्डांपासून दूर आहे. या महिलेवर अ‍ॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) उपचार करण्यात येत आहे. यात तीन प्रकारची औषधी, मलेरियाचे औषधोपचार सुरू आहेत. उपचाराच्या ४ दिवसांनी महिलेचा ‘स्वॅब’ पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. 

प्रत्येक जण मास्क घालूनज्या खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहे, तेथे प्रत्येक जण मास्क घालून वावरताना दिसून आला. आरोग्य अधिकारीही मास्क घालूनच होते. रुग्णालयात विनाकारण प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यातही येत होते. 

१२ खाजगी रुग्णालयांत १०३ खाटा, मनपाची प्रतीक्षाचशहरात जिल्हा रुग्णालयात आणि घाटी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र विभाग, खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच १२ खाजगी रुग्णालयांत १०३ खाटाही सज्ज आहेत. महापालिकेने स्वत:चा अद्यापही कोणता कक्ष, खाटा आरक्षित केलेल्या नाहीत. ३० खाटा उपलब्ध के ल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘डेंग्यू’ प्रमाणे हलगर्जीपणा नकोशहरात पावसाळ्यात डेंग्यूचा एकच उद्रेक झाला होता. जवळपास १२ जणांचा त्या बळी गेला होता. डेंग्यू नियंत्रणात आणण्यात महापालिका आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली होती. कोरोना विषाणूच्या नियंत्रणात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची ग्वाही मपना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसProfessorप्राध्यापक