शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in Aurangabad : मुंबईत कर्तव्य बजावून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 13:54 IST

corona virus in Aurangabad : १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले.

ठळक मुद्देएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्हेंटिलेटर मिळाला नसल्याचा नातेवाइकांचा आरोप

औरंगाबाद : मुंबईतील बेस्ट वाहतुकीसाठी कर्तव्य बजावून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाच्या वाहकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या वाहकाचा दुर्दैवाने साेमवारी मृत्यू झाला.

शेकनाथ शंकर सिरसाठ (४९) असे मयत वाहकाचे नाव आहे. शेकनाथ सिरसाठ हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. ते १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले. येथे आल्यानंतर १९ एप्रिल रोजी त्यांनी कोरोना तपासणी केली. २० एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रारंभी ४ दिवस त्यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. प्रशासनाकडून सदर वाहकाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

व्हेंटिलेटरची शोधाशोधशेकनाथ सिरसाठ यांचे नातेवाईक विजय कळम म्हणाले, शहरात व्हेंटिलेटरची शोधाशोध केली; परंतु कुठेही ते उपलब्ध झाले नाही. ऑक्सिजन देऊन उपचार केले. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण होत आहे.

५० लाखांचा विमा कवच मिळावाअन्य विभागातून मुंबईला चालक-वाहकांना पाठविणे बंद झाले आहे; परंतु औरंगाबादेतून कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविणे सुरूच आहे. हे बंद झाले पाहिजे. जे कर्मचारी कोरोनाने मृत्यू पावले, त्यांच्या नातेवाइकांना ५० लाखांचे विमा कवच दिले पाहिजे.- बाबासाहेब साळुंके, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या