शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:35 IST

Corona Virus:आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होईना

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील तब्बल ५७० मृत्यूपासून केंद्र सरकार अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण कोरोनासंदर्भातील पोर्टलवर औरंगाबादेत २ हजार ३५२ मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात रविवारपर्यंत औरंगाबादेत २ हजार ९२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेतील मृत्यूची गंभीर स्थिती केंद्रापासून लपून रहात असून, त्यातून उपाययोजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्यासंदर्भातील स्थानिक स्तरावरील माहिती जिल्हा स्तरावरून आरोग्य उपसंचालक कार्यालय, तेथून पुढे राज्य शासनाला माहिती जाते. तर राज्याकडून केंद्राकडे माहिती जाते. कोरोनासंदर्भातील रुग्णसंख्या, मृत्यूची स्थिती स्थानिक पातळीवरून थेट केंद्राला लक्षात यावी, यासाठी पोर्टलवर नोंद करणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका, घाटी यांना कोरोना रुग्णांची, मृत्यूची नोंद करण्यासाठी पोर्टलचा लाॅगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे. परंतु अनेकांकडून ही माहिती भरण्यास अनेक कारणांनी विलंब होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कागदोपत्री (मॅन्युअली) कोरोना मृत्यूचे आकडे वेगळे आहेत, तर पोर्टलवरील आकडे वेगळे आहेत. यात तब्बल ५७० रुग्णांच्या मृत्यूचा फरक पडत आहे. स्थानिक पातळीवर जरी ही नोंद असली तर पोर्टलवर नोंदीअभावी केंद्राला त्यासंदर्भात माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेत मृत्यू कमी असल्याचे कारण पुढे होऊन कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे केंद्राकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाॅररूममध्ये नोंदणीवर भरआरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे. महापालिकेचेही स्वतंत्र वाॅररूम आहे. पाेर्टल म्हणजे एकत्रित रिपोर्टिंग प्रणाली आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंदणी करण्यावर भर दिला जात असल्याचे आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे म्हणाले.

नोंद करण्याची सक्त सूचनाप्रत्येक आरोग्य संस्थेला पोर्टलवर नोंदणी करण्याची सक्त सूचना केली आहे. जिथे रुग्णाचा मृत्यू झाला तेथूनच नोंद होणे गरजेचा आहे. मॅन्युअली आणि पोर्टलवरील संख्येत फरक आहे. परंतु मंत्रालयाला रोज रिपाेर्ट दिला जातो. पोर्टलवरील नोंदी केंद्राला दिसतात.- डाॅ. जी. एम. कुडलिकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद